नाना पटोले यांनी भाजप विरुद्ध बंड पुकारले आहे. उद्या ते भाजप विरोधात राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. मात्र, उद्याच ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी भाजप राज्यव्यापी चक्कजाम आंदोलन करणार आहेत. यामुळे राज्यात एकूणच खळबळ उडाली आहे. भाजप 26 जूनला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करणार आहे. याबाबत माहिती भाजपने काही दिवसांपूर्वीच दिली होती (BJP is going to hold a statewide Chakkajam agitation on June 26).
नाना पटोलेंची मोदी सरकारवर टीका, ओबीसींचे आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार
‘धनगरांनी भाजपच्या आंदोलनात सहभागी होऊ नये’
ओबीसी समाजाचे आरक्षण हे मोदी सरकारमुळे रद्द झाले आहे. याला जबाबदार मोदी सरकार आहे. असे ट्विट करत त्यांनी भाजप वर टीका केली आहे. उद्या होणाऱ्या त्यांच्या आंदोलनाची माहिती त्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्याला सध्याचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे. ओबीसींचे हे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे. मोदी सरकार विरोधात २६ जून रोजी काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहोत. असे नाना पटोले म्हणाले आहेत.
मात्र, उद्या ओबीसींना आरक्षण मिळावे यासाठी भाजप ही राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. याच दिवशी काँग्रेस देखील भाजप विरोधात आंदोलन करणार आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भाजपचे आंदोलन फेटाळून लावण्यासाठी काँग्रेस हे आंदोलन करत आहे. अशी शंका वर्तवली जात आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा एकदा जन्म घ्यायला हवा
Assam: Why the Latest Defection From Congress to BJP Is Significant
महाराष्ट्रात ज्यावेळी भाजपचे सरकार होते तेव्हा ओबीसी समाजाचे आरक्षण त्यांनी का मंजूर केले नाहीत. हे सगळ त्यांच नाटक आहे असे आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. इंपिरिअल डाटा मोदी सरकारने दिला नाही. केंद्र सरकार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात असुन सत्तेच्या सात वर्षाच्या काळात त्यांनी ओबीसीसाठी काहीही केलेले नाही. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द होण्यास केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे असा आरोप छगन भुजबळ यांनी देखील केला आहे (Chhagan Bhujbal has also accused the Narendra Modi government at the Center of being responsible for the cancellation of OBC political reservation).
सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या…
भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…
भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…
कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…
आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…