लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : काँग्रेससोबत आमचे राजकीय मतभेद आहेत. तो आमचा दुश्मन नाही. भाजपसोबत सुद्धा आमचे मतभेद आहेत. त्यामुळे काँग्रेस स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न करीत असेल तर महाराष्ट्र त्याचे स्वागतच करेल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील या सगळ्यांचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे, याकडेही राऊत यांनी लक्ष वेधले. जीएसटी, नोटबंदी अशा मुद्द्यांवर आमचे भाजपसोबत मतभेद आहेत. बेळगाव महाराष्ट्रात यावा ही शिवसेनेची भूमिका आहे. भाजप सरकारने त्यासाठी तडफ दाखवावी. या मुद्द्यावरही आमचे भाजपसोबत मतभेद आहेत, असे खासदार राऊत यांनी सांगितले.
काँग्रेससोबत मतभेद असले तरी आम्ही एकत्र येऊ शकतो, असे संकेत राऊत यांनी दिले असल्याचे दिसून येत आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…