टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. तसेच राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्यामुळे राज्यात सतत होत असलेल्या लॉकडाऊनवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘महाराष्ट्रात लोकशाही आहे असे म्हटले जायचे. पण आता महाराष्ट्रात ‘लॉक’शाही (लॉकडाऊन) सुरू आहे,’ असा सणसणीत टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला हाणला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कोरोना काळातील कारभारावर सडकून टीका केली. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. ‘देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग महाराष्ट्रात आहे. कोरोना रुग्णांचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत. अशी अवस्था या सरकारने महाराष्ट्राची करून ठेवली आहे,’ असे ते म्हणाले.
‘कोरोना रोखण्याचा उपाय म्हणून कधी लॉक, कधी अनलॉक असा खेळ सुरू आहे. लॉकडाऊनसारख्या गोष्टी गरजेच्या असतात. पण ते करताना ज्यांचा रोजगार जातो, त्यांना किमान दिलासा म्हणून सरकारी तिजोरीतून दोन रुपये दिले पाहिजेत याचे भानही या सरकारला नाही. कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड या शेजारच्या राज्यांत तिथल्या सरकारांनी कोरोना काळात सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना मदत केली. वीज बिले माफ केली. सवलती दिल्या. मुळात सरकार असते कसासाठी? अडचणीत मदत करण्यासाठी. परंतु, राज्यातले ठाकरे सरकार हे सावकारांपेक्षाही भयंकर आहे,’ अशी तोफ फडणवीसांनी डागली.
तर माझे नावच बदलून टाकेन!
वीज बिल वसुलीच्या मुद्द्यावरूनही फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवला. ‘कोरोना काळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली नाहीच, उलट झिजिया कराप्रमाणे विजेची वसुली केली. आता निवडणूक असल्याने पंढरपूर, मंगळवेढ्यात विजेची कनेक्शन कापणे थांबवले आहे. मात्र निवडणूक झाल्यानंतर १८ तारखेला पुन्हा वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात होईल. तसे नाही झाले तर माझे नावच बदलून टाकेन,’ असा शब्दही त्यांनी दिला. हे सरकार लबाड आहे, असे ते म्हणाले.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(School children told…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath Shinde being Chief Minister is…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Beloved sister does…