राजकीय

पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

टीम लय भारी

मुंबई: अमरावतीत 12 नोव्हेंबर रोजी झालेली घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेला घडलेली घटना त्याहूनही निंदनीय आहे. या दोन्ही घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस तपास करत आहेत, असं सांगतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अर्धवट माहिती घेऊन बोलत आहेत(Fadnavis’s statement is irresponsible; Yashomati Thakur’s counterattack)

त्यांचं विधान बेजबाबदारपणाचं लक्षण आहे, असा पलटवार अमरावतीच्या पालकमंत्री आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

BJP : ‘भाजपा म्हणजे भंगार पक्ष, पराभवानंतर तेसुध्दा ….

नेट बँकिंग करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा फसवणूक होईल

अमरावती हिंसेवरून देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. पालकमंत्री यशोमती ठाकूर या घटनेवर मौन का? असा सवालही त्यांनी केला होता. फडणवीसांची ही पत्रकार परिषद होताच यशोमती ठाकूर यांनी मीडियाशी संवाद साधत फडणवीसांच्या आरोपांचं खंडन केलं.

फडणवीस जबाबदार नेते आणि विरोधी पक्षनेते आहेत असं वाटलं होतं. पण त्यांनी आज बेजाबाबदारपणे विधाने केली. फडणवीसांची एकदोन वक्तव्य आवडले नाही. ते भडकवत असल्यासारखं वाटलं. हिंदू-मुस्लिम करू नका. अर्धवट माहिती घेऊन ते बोलत आहेत. त्यांनी पूर्ण अभ्यास करावा. त्याच्या पत्रकार परिषदेवर माझा आक्षेप आहे. 12ची घटना निंदनीय आहे. पण 13 तारखेची घटना त्यापेक्षाही अधिक निंदनीय आहे.

Devendra Fadnavis : प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दहा निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला – फडणवीस

Fadnavis dares MVA govt to ban Raza Academy in Maharashtra

दोन्ही आंदोलकांवर गुन्हे दाखल केले आहेत. महाविकास आघाडी सरकार निष्पक्षपाती भूमिका घेत आहे. ज्यांनी कोणी दंगल भडकवली त्याला सोडलं जाणार नाही. आता अमरावती शांत झालं आहे. कोणीही बाहेरून येऊन आमच्या अमरावतीला भडकावू नका, असं आवाहन ठाकूर यांनी केलं.

दंगेखोरांना सोडणार नाही

दोन्हीकडच्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत. सायबरचा रिपोर्ट सर्वांसमोर आहे. दोन्ही कट्टरपंथी दोस्त आहेत. सामान्यांना वेठीस धरलं जात आहे. पण ज्यांनी दंगल भडकवली त्यांना सोडलं जाणार नाही. ज्यांनी 12 आणि 13 तारखेला हिंसा निर्माण केली. त्या दोन्ही समाजातील लोकांवर गुन्हे दाखल होत आहे. दंगल झाली. सर्वांनी पाहिली. सामान्य लोकांनी आधार दिला म्हणून गाव आणि शहर शांत ठेवू शकलो, असं त्या म्हणाल्या.

रझा अकादमीचा फायदा कुणाला होतो सर्वांना माहीत

रझा अकादमी आणि कट्टरपंथीयांचा फायदा कुणाला होत असतो हे संपूर्ण हिंदुस्थानाला माहीत आहे. मला बोलण्याची गरज नाही. ज्या गोष्टी हिंसा निर्माण करतात ज्या संस्था सपोर्ट करतात, जे लोक हिंसक बोलतात त्यांच्यावर कारवाई केली आहे. ज्यांनी उद्या काही हिंसा भडकवली तर त्यांच्यावरही कारवाई करू. कुणालाही सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

होय, इंटेलिजन्स फेल गेलं

कोणत्याही मोर्चाला परवानगी दिली नव्हती. मोर्चाची परवानगी नाकारली होती. या ठिकाणी इंटेलिजन्स फेल झालं. का झालं यांचं आश्चर्य आहे. इंटेलिजन्स फेल जाण्यास कोणी अधिकारी जबाबदार असेल तर कारवाई करू. इंटेलिजन्स फेल गेलं त्याची चौकशी झालीच पाहिजे. मी कारवाईचा आग्रह धरला आहे. पत्रं तयार आहे. कॅबिनेटमध्ये पत्रं देऊन चर्चा करणार, असं त्यांनी सांगितलं.

टीम लय भारी

Recent Posts

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करा: रमेश चेन्नीथला

घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना  अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार…

2 mins ago

भाजपच्या नेत्यांची खुमखुमी, नरेंद्र मोदींची करणार फजिती

लय भारी ची टीम नाशिक येथील पिंपळगाव दिंडोरी येथे पोहोचली असून निवडणुकी संदर्भात बऱ्याच मतदारांशी…

2 hours ago

पोलिसांचा निजामी कारभार, शिवसेनेच्या २० जणांना तडीपारीच्या नोटीसा, आता ‘हल्ला” करण्याचा डाव !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता झालेला असुन शेवटच्या टप्पा आता लवकरच होऊ घातलेला आहे. येत्या…

2 hours ago

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव गोऱ्हाणे यांची मुलाखत

निवडणुकीच्या धामधुमीत वेगवेगळ्या मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत असतानाच लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी…

3 hours ago

शेतकरी म्हणाले नरेंद्र मोदींना कांदे फेकून मारणार,कांदे सभेत कसे नेणार ते मीडियाला नाही सांगणार

निवडणुकीच्या धामधुमीत वेगवेगळ्या मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत असतानाच लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी…

8 hours ago

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

21 hours ago