लय भारी टीम
अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयानं गैरवर्तणूक आणि फेरफार केल्याच्या आरोपावरून ढोलका विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रद्द ठरवली. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मंत्रिमंडळात असलेले कायदामंत्री भूपेंदरसिंह चुडासामा यांची आमदारकी गेली आहे. काँग्रेसचे उमेदवार आश्विन राठोड यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं हा निकाल दिला. गुजरात सरकारला मंगळवारी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानं धक्का बसला.
या विषयी अधिक माहिती अशी की, गुजरात विधानसभेसाठी २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत ढोलका मतदारसंघातून भूपेंद्रसिंह चुडासामा हे भाजपाचे उमेदवार होते. तर काँग्रेसकडून आश्विन राठोड यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक निकालात चुडासामा यांनी आश्विन राठोड यांचा ३२७ मतांनी पराभव करत विजय संपादन केला होता. निकालानंतर काँग्रेसचे उमेदवार राठोड यांनी मतमोजणीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. ४२९ मतं मोजण्यात आली नाही, असं त्यांनी याचिकेत म्हटलं होतं. याप्रकरणी आश्विन राठोड यांनी थेट उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
काय होता याचिकेत आरोप…
“भाजपाचे आमदार भूपेंद्र सिंह चुडासामा यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध ठिकाणी विशेषतः मतमोजणी वेळी भ्रष्ट वर्तन केलं. त्याचबरोबर नियमांचं उल्लंघन केलं,” असा आरोप राठोड यांनी याचिकेत केला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती परेश उपाध्याय यांच्या खंठपीठासमोर सुनावणी सुरू होती.
मंगळवारी (१२ मे) न्यायालयानं प्रकरणाचा निकाल दिला. राठोड यांनी केलेले आरोपांचा ठपका ठेवत न्यायालयानं ढोलका मतदारसंघातील निवडणूक रद्द केली. उच्च न्यायालयाच्या निकालाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. चुडासामा यांनी गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
चुडासामा यांच्याकडे होती दोन खाती…
मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या सरकारमध्ये भूपेंद्रसिंह चुडासामा हे दोन खात्यांचे मंत्री आहेत. कायदा मंत्र्यांबरोबर शिक्षण मंत्र्याची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…