जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध करतानाच भाजपलाही काही सवाल केले. जनआशिर्वाद यात्रा कशासाठी? पेट्रोल – डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या म्हणून की, महाराष्ट्रात व देशात महागाई वाढवली म्हणून? जनतेने यांना आशिर्वाद कशासाठी द्यायचा? असे सवाल जयंत पाटील यांनी भाजपला केला आहे.
दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांचे मानले आभार
शरद पवारांच्या मागोमाग जयंत पाटीलांनीही घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केलेले वक्तव्य चुकीचे आहे. अशी भाषा महाराष्ट्रात कधीच कुणी वापरली नव्हती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंत्र्याला कशाच्या आधारे मंत्रिमंडळात घेतले? असा सवाल करतानाच राणेंच्या वक्तव्याला तुम्ही समर्थन करत आहात काय?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला आहे (Jayant Patil to Chandrakant Patil and Leader of Opposition Devendra Fadnavis).
नारायण राणे यांच वक्तव्य निषेधार्थ आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल ही भाषा वापरणे चुकीचे आहे. राजकारणाचा स्तर खाली गेला आहे, असे नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
नारायण राणेंना उद्धव ठाकरेंचा झटका
महाराष्ट्रात शिवसेनेने जबाबदारीने वागायचे काम केले आहे. कायदा कोणाला हाती घेऊ देणार नाही. राष्ट्रवादी याचे समर्थन करणार नाही. गृहखात्याला याबाबत जास्त माहिती आहे. विधानाकडे बघितले तर परिस्थिती समजू शकतो, असे जयंत पाटील म्हणाले.
मोदींचे वक्तव्य समजावे लागेल
राणेंनी केलेले वक्तव्य हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य समजावे लागेल. कारण मोदींनीच त्यांना मंत्री केले आहे. त्यामुळे राणेंच्या वक्तव्याचे फडणवीस आणि पाटील समर्थन करत आहेत का? असा माझा सवाल आहे. फडणवीस आणि पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी. नाही तर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या मागे भाजप लागल्याचे चित्रं देशात जाईल, असे जयंत पाटील म्हणाले (Jayant Patil following BJP behind the Chief Minister will go to the country).
गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…
राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…
कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…