दोन दिवसापासून माझा दौरा सुरू आहे. आज नाशिक जिल्ह्यात असून बालेकिल्ला आणि फालेकिल्ला कुणाचा नसतो, नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला असल्याचे विधान मराठा युद्ध मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना केले. पाटील हे गुरूवारी ( दि. ८) नाशिकः दौऱ्यावर आले असता सकाळी शासकीय विश्राम गृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की भुजबळ यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही मी त्यात पडणार नाही. मी इतक्या खलाच्या पातळीला जाणार नाही. त्यांनी फक्त गरीब नाभिक समाजाची माफी मागावी.दुसऱ्याच्या अन्नात माती कालव्याची हेच त्यांचे काम आहे असा टोला मनोज जरंगे पाटील यांनी लगावला .
गरीब लोकांच्या नरड्यावर तो पाय देत आहे.
ज्या पक्षात जाईल तो पक्ष त्यांनी मोडले आहेत्यांनी आम्हाला विरोध करू नये नाहीतर आम्हाला मंडळ आयोगाला देखील चॅलेंज करावे लागेल. येत्या १५ पासून जे अधिवेशन होणार आहे, त्या अधिवेशनात कायदा रूपांतर करावे यासाठी १० तारखेपासून उपोषण करणार आहे. २००१ च्या कायद्यात दुरस्ती करून अधिसूचना काढली असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले . यावेळीछावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, विलास पांगारकर अशीश हिरे यांच्यासह बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
राज ठाकरे यांच्या पाठीशी देखील मराठा
समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात आहेत.
ते अस कधीच बोलत नाहीत. नाशिकला आल्यावर ते आमच्या विरोधात बोलले. नाशिक चे पाणीच तसे असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.
सगेसोयरे यांच्या बद्दल जे अध्यादेश काढले आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी पुन्हा आंदोलन आहे
त्यांनी सगळ्या कामाला लागला आहे मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचे नाही मात्र आम्ही आता सरसकट गेलो
ओबीसी नेत्यांनी आमच्या अध्यादेशाला चॅलेंज केले तर आम्ही देखील करू कारण याआधी देखील 3 वेळा असे झाले आहे
तुमच्या इतक्या खालची नियत आमची नाही मात्र आता आमचा नाईलाज आहे तुम्ही गप्प नाही बसले तर आम्ही देशातील 27 टक्के ओबीसी आरक्षण घालवू विनंती केली,मध्यस्थी केली,पाय पडलो तरी ते ऐकत नाहीत . राजकारणातील मला काही कळत नाही फक्त आरक्षण बाद्दल मी बोलतो . ओबीसी आरक्षण हक्काचे आहे,दोन्हीकडे प्रयत्न सुरू आहेत मराठा समजाचा चांगल होईल. ओबीसी मधून आरक्षण सुरू केली,जबरदस्ती नाही ज्यांना घ्यायचे आहे त्यांनी घ्यावे माझं शरीर मला साथ नाही तरी मी मरण हातात घेऊन आंदोलन करणार आहे. मुंबईत गेल्यावर कसे पळत होते सगळे त्यामुळे आता घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असे मनोज जरंगे पाटील म्हणाले.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…
7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…
पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…
भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…
भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…
शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…