अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले या घटनेला पाच दिवस झाले आहेत. असे असताना दोन्ही गटाकडून आमच्याकडे जास्त आमदार असल्याचा दावा करण्यात येत असताना, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 44 आमदार आमच्या सोबत आल्याचा दावा केला आहे. विरोधी पक्षनेता राष्ट्रवादी काँग्रेसचाच कायम राहणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ४५ आहे. आम्ही नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यांना निलंबित केलं आहे. ते नऊ आमदार सोडून बाकी सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. असा दावा आव्हाड यांनी माध्यमांबरोबर बोलताना केला.
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या सत्तासंघर्षाला सुरुवात झाली आहे. अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आणि नाव यावरून दोन्ही गटांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहे. दरम्यान, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं विधान केलं आहे.
अपात्रतेची याचिका दाखल केलेले आमदार वगळता सर्व आमदार शरद पवार गटाकडे आहेत, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने विरोधी पक्षनेता कोणत्या पक्षाचा असणार? असा प्रश्न विचारला असता जितेंद्र आव्हाड म्हणाले, “विरोधी पक्षनेता राष्ट्रवादी काँग्रेसचाच कायम राहणार आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या ४५ आहे. आम्ही नऊ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यांना निलंबित केलं आहे. ते नऊ आमदार सोडून बाकी सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.
हे सुद्धा वाचा
शिंदे गटाच्या आमदार मंडळींची नाराजी दूर करण्याचा फॉर्म्युला ठरला
खुर्चीचा मोह, नाती तोडतो, नैतिकता विसरवतो!
राहुल गांधींवरील कारवाईविरोधात, सर्वोच्च न्यायालयात जाऊ: नाना पटोले
३ जुलैला अजित पवार गटाची पत्रकार परिषद झाली होती. त्यामध्ये प्रत्येक नेत्याने सांगितलं की, शरद पवार आमचे दैवत आहेत. शरद पवार आमचे विठ्ठल आहेत. शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. सगळ्या नेत्यांनी हे ३ जुलैला बोललं आहे. आता तेच नेते म्हणतायत की, आम्ही ३० तारखेलाच निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं होतं. या सर्व मॅनेजमेंटच्या बाबी आहेत, असंही आव्हाड पुढे म्हणाले. आव्हाड यांच्या दाव्याला अजित पवार गट कसं खोडून काढतो हे पाहण्यासारखे आहे.
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…