लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडून आम्हाला निमंत्रण मिळाले आहे. त्यानुसार आम्ही काँग्रेससोबत पुढील चर्चा करीत आहोत. काँग्रेसशी चर्चा करूनच सत्ता स्थापनेबाबतचा पुढील निर्णय घेऊ अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी पत्रकारांना दिली.
सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने शिवसेनेने राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. परंतु राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यपालांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली.
‘लय भारी’ बातम्या वॉट्सअपवर मिळविण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा
त्यानंतर काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची उद्या 10 वाजता नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित असतील. राष्ट्रवादी काँग्रेसनेही दुपारी 1 वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.
राज्यपालांनी आम्हाला पत्र दिले आहे. आम्ही राज्यपालांना भेटलो आहोत, आमच्या घटक पक्षांशी चर्चा करून तुम्हाला कळवतो, असे आम्ही त्यांना सुचविले आहे. उद्या 8.30 वाजेपर्यंत आम्हाला वेळ मिळालेला आहे.
– जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभेचे निकाल लागून आज 18 दिवस झाले. भाजप व शिवसेना महायुतीला बहुमत मिळाले होते. परंतु मुख्यमंत्रीपद कोणी घ्यायचे यावरून दोन्ही पक्षांचे बिनसले. त्यातून भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी 24 तासांची मुदत दिली होती. शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आमच्या आज सकाळपासूनच बैठका सुरू होत्या. राष्ट्रवादी पक्षाने काँग्रेस निवडणुका लढलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस सोबतच आमचा निर्णय होईल, अशी आमची भूमिका होती. काँग्रेसच्या नेत्यांनी पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार पुढील निर्णय होईल, असे नवाब मलिक म्हणाले.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये 24 तासांत सहमती झाली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांकडून अधिक वेळ मागितला होता. परंतु राज्यपालांनी आता तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. त्यानुसार आता आम्ही काँग्रेससोबत चर्चा करून स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न करू.
– नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादीसमोरही बहुमताचा पेच
राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी निमंत्रण केले आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस (54) व काँग्रेस (44) मिळून जेमतेम 100 आमदारांचेही संख्याबळ होत नाही. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा पाठिंबा घ्यावा लागेल. परंतु मुख्यमंत्री आमचाच असेल अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. त्यामुळे शिवसेना मुख्यमंत्रीपद सोडायला तयार होणार नाही. सत्ता स्थापनेचा पेच आणखी गुंतागुंतीचा बनला आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…