राजकीय

भीती खरी ठरली! औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर आता शिंदे – फडणवीस सरकारची नवी खेळी

टीम लय भारी

मुंबई : औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराच्या निर्णयाला सत्ता बडखास्त करण्याआधी महाविकास आघाडीने मंजूरी दिली होती; परंतु शिंदे – फडणवीस सरकारकडून आता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे नव्या सरकारच्या या निर्णयावर पुन्हा राजकीय संघर्षाची ठिणगी पडणार आहे.

शिवसेना आमदार एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंड पुकारले त्यामुळे महाविकास सरकार दाणकन आपटले. बंडामुळे संख्याबळ कमी झाले असले तरीही सरकार बरखास्त करण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या  नामांतरावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राज्यात आता शिंदे – फडणवीस यांचे नवे सरकार आले आहे, त्यामुळे महाविकास आघाडीने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांना खोडून आपलाच घोडा दामटण्याची खेळी या सरकारकडून खेळण्यात येत आहे. आरेच्या मुद्यानंतर नवं सरकार आता नामांतरांच्या निर्णयावर आपली भूमिका मांडू लागले आहे.

दरम्यान औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दि. बा पाटील असे नामांतरच्या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्धीचे पत्र दिल्यानंतर मंत्रिमंडळात अशा प्रकारचे लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेता येत नाहीत असे म्हणून महाविकास सरकारच्या या निर्णयाविरोधात आक्षेप घेत स्थगिती देण्यात आली आहे.

याआधी नामांतराच्या निर्णयावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. आता नव्या सरकारकडूनच याबाबत पाऊल उचलण्यात आले असून शिंदे सरकार तिन्ही नामांतरांच्यां मुद्यावर नव्याने निर्णय घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा…

आजपासून पुढील 75 दिवस ‘कोविड बुस्टर’ डोस मिळणार मोफत

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

पन्हाळगडाच्या पडझडीला केंद्र सरकार जबाबदार

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

41 mins ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

1 hour ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

2 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

2 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

3 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

4 hours ago