मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी जालनासह राज्यातील मराठा आंदोलक, समाज आक्रमक झाले असताना जालनामध्ये जखमी आंदोलकांना भेटायला गेलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी, ‘ मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही,’ असे वक्तव्य केले आहे. त्यांनी हे वक्तव्य मराठा आंदोलन चिघळले असताना का केले, याची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.
मराठा आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही राज्यभर उमटत आहेत. आज तर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंदही पुकारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार बंद आहेत. तर अनेक ठिकाणी एसटीची वाहतूक ठप्प आहे. तर, दुसरीकडे राजकीय नेत्यांचा जालन्यात जाण्याचा ओघ काही कमी होताना दिसत नाही. राज ठाकरे हे सोमवारी जालना दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावर अनेकांचे लक्ष आहे.
राज ठाकरे हे सकाळीच जालन्याकडे जायला निघाले. औरंगाबादला आल्यानंतर ते कारने जालन्याकडे जायला निघाले होते. यावेळी राजापूर जवळ मराठा आंदोलकांची निदर्शने सुरू होती. राज ठाकरे यांचा ताफा आल्याचं समजताच या आंदोलकांना राज ठाकरे यांचा ताफा अडवला. राज ठाकरे यांनीही कारच्या खाली उतरून मराठा आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी आंदोलकांनी राज ठाकरे यांना निवेदनही दिलं. यावेळी आंदोलकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज ठाकरे यांनी आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर पुन्हा त्यांचा ताफा राजापूरकडे रवाना झाला. त्यानंतर पुन्हा दाभरूळ गावात मराठा आंदोलकांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना निवेदने दिली. पैठणच्या आडगाव जावळेतही त्यांचा ताफा अडवण्यात आला. त्यावेळी त्यांनी माईकवरून आंदोलकांशी संवाद साधला. मी घटनास्थळी गेल्यावर माझी भूमिका मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या राजकारण्यांच्या नादी लागू नका. या लोकांना फक्त तुमची मते हवी आहेत, असंही ते म्हणाले.
त्यानंतर राज ठाकरे हेही घटना घडली त्या ठिकाणी गेले आणि उपस्थित मंडळींना संबोधित करताना त्यांनी,’ राज्यात मराठा समाजाचे मोर्चे निघत असताना मी सांगितले होते की, मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, सर्वोच्च न्यायालयात हा तिढा आहे. सगळेच राजकारणी मराठा आरक्षणावरून मराठ्यांना फसवत आहे. पूर्वी विरोधात असलेल्या मंडळींनी अनेक आश्वासन दिली. सत्तेत आल्यावर त्यांनी आंदोलनकर्त्यांना तुडवले. आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करणारे पोलिस दोषी नाहीत, त्यांना आदेश देणारे दोषी आहेत ‘ असे म्हणून राज ठाकरे यांनी सत्ताधारी मंडळींवर निशाणा साधला. शुक्रवारी मराठा आंदोलकर्त्यावर लाठीचार्ज झाल्यावर दुसऱ्या दिवशी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत जखमींची विचारपूस केली होती.
चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…
आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि शॅम्पूचा वापर करतो.…
अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…
बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…
आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…
आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…