राजकीय

शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय नको गिरीश महाजनांना संजय शिरसाठ यांनी सुनावले

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत सुरु असलेल्या वादात आता भाजपची एन्ट्री होतांना पाहायला मिळत आहे. नाशिक भाजपचा बालेकिल्ला असून, नाशिकमध्ये तीन आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक भाजपचे असल्याचा दावा करणाऱ्या गिरीश महाजन यांच्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली आहे. संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोला संजय शिरसाट यांनी गिरीश महाजन याना लगावला आहे.गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने नाशिकच्या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडतांना पाहायला मिळत आहे. नाशिक भाजपचा बालेकिल्ला आहे. नाशिकमध्ये तीन आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे नाशिक हा भाजपचाच बालेकिल्ला आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलंय.(Sanjay Shirsat tells Girish Mahajan not to disrupt Mahayuti by tying chindi to tail )

तर, ते संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोला संजय शिरसाटांनी लगावला आहे. तसेच, जे रामराज्य सुरू आहे ते सुरू राहू द्या असेही शिरसाट म्हणाले.शनिवारी रात्री 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरु होती . यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, “काल फक्त उमेदवार हा विषय नव्हता, प्रचार कसा करायचा हा पण विषय झाला. उमेदवार फायनल झाल्यावर वेळ राहणार नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंची सगळी यंत्रणा कशी असेल यावर चर्चा झाली असल्याचे शिरसाट म्हणाले.याचवेळी शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली, “तो संजय राऊत आहे. त्याला आधी शरद पवार यांना पंतप्रधान करायचे होते. मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. मग त्यांना ती चूक कळली. आता तो राहूल गांधीच्या गळ्यात गळा घालतो. त्यामुळे त्याचा प्रवास बघा कुठून कुठे चालला आहे, असे शिरसाट म्हणाले.

यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की, “काल फक्त उमेदवार हा विषय नव्हता, प्रचार कसा करायचा हा पण विषय झाला. उमेदवार फायनल झाल्यावर वेळ राहणार नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंची सगळी यंत्रणा कशी असेल यावर चर्चा झाली असल्याचे शिरसाट म्हणाले.याचवेळी शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली, “तो संजय राऊत आहे. त्याला आधी शरद पवार यांना पंतप्रधान करायचे होते. मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. मग त्यांना ती चूक कळली. आता तो राहूल गांधीच्या गळ्यात गळा घालतो. त्यामुळे त्याचा प्रवास बघा कुठून कुठे चालला आहे, असे शिरसाट म्हणाले.

टीम लय भारी

Recent Posts

धनुषच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…

5 hours ago

व्यायाम केल्यानंतर किती वेळाने काही खावे? जाणून घ्या

आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…

7 hours ago

चालताना गुडघेदुखी वाटते का? मग दररोज करा हे 3 व्यायाम

बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…

7 hours ago

Jaykumar Gore | आजींनी लाडकी बहिण, वयश्री सगळ्याच योजनांचा बुरखा फाडला |

जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…

8 hours ago

लाडकी बहीण योजनेतील १५०० रूपये ही भीक | महिलेने सरकारचे वाभाडेच काढले

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…

9 hours ago

नसांसंबंधी समस्यांवर रामबाण उपाय आहे डाळिंबाचा रस

आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…

9 hours ago