लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत येण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे आमदार व नेते आज जाम खुष होते. या आनंदातच आमदारांनी शरद पवार यांना त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्याची विनंती केली. स्वतः पवार सुद्धा प्रसन्न मुडमध्ये होते. त्यांनी सुद्धा ही विनंती लगेच मान्य केली, अन् सगळ्यांसोबत छायाचित्र काढले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. त्यानंतर सगळेजण विधानभवनात गेले होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची आज जयंती आहे. त्यामुळे विधानभवन परिसरातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार विधानभवनात आले होते. मात्र त्या अगोदर आमदारांच्या आग्रहास्तव शरद पवार यांनी सर्वांसमवेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर एक छायाचित्र काढले.
राष्ट्रवादीकडून पाच जणांची समिती गठीत
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार बनविण्याचा निर्णय निश्चित झाला आहे. त्यासाठी किमान समान कार्यक्रम आखला जाणार आहे. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांचा समावेश असेल.
हे सुद्धा वाचा
संजय राऊत डिस्चार्ज नंतर पुन्हा म्हणाले, मुख्यमंत्री शिवसेनेचाच!
स्थिर सरकारसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं हलाहलही पचवू – शिवसेना
संजय राऊतांची भूमिका राज्यातील जनतेला आवडली, काँग्रेसने केले कौतुक
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…