आम्ही प्रत्येक माणसात ‘राम’ बघतो. ‘आत्माराम ‘ महत्वाचा आहे. त्याचीच सेवा महत्वाची असते. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानली गेली आहे. हीच शिकवण आमच्या सर्व संतांनी दिली आहे. सर्व महात्मे सजीवसृष्टी महत्वाची मानत होते. आम्हाला संत तुकाराम, संत गाडगेबाबा, संत कबीर यांचे तत्वज्ञान पचत नाही फक्त त्यांचे फोटो हवे आहेत.
देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाने देश उभारणी करताना शिक्षण , आरोग्य, अन्न , वस्त्र , निवारा , शेती , उद्योग व दळणवळण इत्यादी सर्वांगीण विकासासाठी प्रथम प्राधान्य दिले होते.म्हणूनच आजचा भारत देश सर्वांगीण प्रगती करत उभा आहे. राज्य घटनेने श्रद्धा व उपासना यांचे व्यक्तीस्वातंत्र्य देत असतानाच वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा मानलेला आहे.
सन 1990 पासून देशात मंदिर – मस्जिद असा वाद उभा करताना धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचे कुटील राजकारण आजही आरएसएस व भाजप करत आहेत.
शरद पवारांकडून ‘रयत’वर आणखी एका IAS अधिकाऱ्याला संधी
मानवाच्या शिक्षण- आरोग्य – रोजगार इत्यादी दैनंदिन जगण्याचे प्रश्न त्यांना कधीच महत्वाचे वाटले नाहीत. किती वर्षे मंदिर मस्जिद याच्यावर बिनकामी चर्चा व घाणेरडे राजकारण करणार आहात ( Politics on Ram Mandir ) ?
आजच्या कोव्हीड – 19 ( Coronavirus ) सारख्या भयंकर संकटाचा सामना करताना जगभरात फक्त हॉस्पिटल्स, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी उपयोगी पडली आहेत. मंदिर, मस्जिद, चर्च इत्यादी कोणतेच प्रार्थना स्थळ अथवा पुजारी, भटजी, मौलवी, पाद्री उपयुक्त ठरलेले नाहीत.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सद्यस्थितीत राम मंदिरापेक्षा जनतेच्या आरोग्य प्रश्नाला प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केल्याबद्दल स्वतःला सुशिक्षित समजणाऱ्या सर्वांना भूमिका पटलेली असणार ( Sharad Pawar’s statement on Ram Mandir is acceptable ).
अंध भक्त मंडळी प्रचंड अस्वस्थ झाली आहेत ( Narendra Modi supporters disturbed on Sharad Pawar’s Statement on Ram Mandir ) . त्यांची अस्वस्थता अत्यंत ढोंगीपणाची आहे. ज्यांना हॉस्पिटलपेक्षा मंदिर महत्वाचे वाटते त्यांनी कोरोना ग्रस्त बांधवांची किंवा कोणत्याही रुग्ण व्यक्तींची मुलाखत घ्यावी.
श्रीराम जनतेचे श्रध्दास्थान आहे. जनतेच्या श्रद्धेवर आपली राजकीय पोळी भाजून काय साध्य करणार आहात ? हा खटाटोप सत्तेसाठीच ना ? श्रीराम माणसांत आहेत. प्रत्येक सजीवांत आहेत. आम्हाला संत शिकवण कधी कळणार आहे ?
आमचे मिळालेले शिक्षण आम्हाला अंधश्रद्ध बनवत असेल किंवा श्रद्धा व अंधश्रद्धा यातील आम्हाला फरक कळत नसेल तर मिळालेले शिक्षण कुचकामी ठरते. ती शैक्षणिक डिग्री कचऱ्यात जमा करायला हवी.
माणसातला राम जगला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करूया व आत्मारामाची सेवा करूया.
विकास लवांडे (9850622722)
पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. वानवडी…
मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…
गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…
मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…
View Comments
There has always been need for stepping up from building temples and places like these to building knowledge temples.
Last around 1000 years reformers , saints like Dnayneshwar, Tukaram, Kabir ......to Mahatma Phule , Shahu Maharaj, Karmveer Bhaurao Patil and many more have sacrificed their lives for the same cause.
The day We the Indians, Bhartiyas shall stop obstructing the service to mankind in the name of God will be the day changing the fate of mother India. All the idealogists , citizens must open their hearts to look at the issues.
As long as you postpone the chance to change your act will always weaken the nation.
Please substract politics and become patriot rather than populist.