नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून रामभाऊ वाजे यांना तिकीट दिले गेले आहे. तिसरे उमेदवार शांतीगिरी महाराज रिंगणात उतरले आहेत (Shiv Sena’s Eknath Shinde group has fielded sitting MP Hemant Godse, Uddhav Balasaheb Thackeray’s Rambhau Waje, the third candidate Shantigiri Maharaj from the group). शांतीगिरी महाराज यांचा मोठा अनुयायी वर्ग या मतदारसंघात आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे. राजकारणात चांगली माणसं येत नाहीत. चांगल्या माणसांनी राजकारणात यायला हवे. तरच राजकारणात बदल घडतील, असे शांतीगिरी महाराज यांनी म्हटले आहे. शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात नाशिकचा विकास झाला पाहिजे. गेल्या १० वर्षात नाशिकला चांगलं नेतृत्व लाभलेलं नाही. त्यामुळे आपण या मतदारसंघाचं नेतृत्व करून एक आदर्श मतदारसंघ म्हणून नाशिकला देशात नावारूपाला आणू, असा आशावाद शांतीगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये अनेक प्रश्न आहेत. तरूण पिढी ड्रग्जच्या आहारी जात आहे. नाशिकचे नाव देशभरात डॅग्ज व वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला येत आहे. हे फारच वाईट आहे. खरेतर नाशिकमध्ये अनेकविध देवस्थानं आहेत. कुंभमेळा नाशिकला भरत असतो. त्यामुळं एक अध्यात्मिक शहर म्हणून नाशिकचा नावलौकीक व्हायला हवा. विकासाला अध्यात्माची जोड देवून आपण नाशिकचा विकास करू, शांतीगिरी महाराज यांनी म्हटलंय. त्यांचे अनुयायी रामानंद महाराज यांनीही शांतीगिरी महाराज यांच्या रूपाने नाशिकला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…