राजभवनात रात्री पाप चालतात : संजय राऊत

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राजभवनात रात्री पाप चालतात, पहाटे पाच वाजता राष्ट्रपती राजवट हटवली जाते याचाच अर्थ राजभवन रात्रभर सुरु होतं. अशी जोरदार टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केली केली.

अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला. अजित पवारांनी जो निर्णय घेतला त्याचा शरद पवारांचा काहीही संबंध नाही. असा घणाघात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर केला. भाजपला जाऊन मिळालेल्या अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अपमान केला आहे. त्यांनी शरद पवारांना दगा दिला आहेच, पण महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. अजित पवार हे आयुष्यभर तडफडत राहतील. अशी जोरदार टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचं सरकार येणार वाटत असतानाच आज अचानक देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या पाठिंब्यानं त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला आणि राजभवनात तातडीनं शपथविधीही झाला. या घडामोडींमुळं शिवसेनेला धक्का बसला आहे. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला. राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जहरी टीका केली. ‘कालपर्यंत अजित पवार आमच्यासोबत बैठकांमध्ये होते. पण चर्चेच्या वेळी ते कोणाच्याही नजरेला नजर मिळवत नव्हते. तेव्हाच त्यांच्या मनात काहीतरी काळंबेरं आहे असा संशय आला होता. पण ते असं काही करतील असं वाटलं नव्हतं,’ असं राऊत म्हणाले.

 

राजीक खान

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago