लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला आज विधानसभेत अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. आज (शनिवार) दुपारी २ वाजता विधानसभेत उद्धव ठाकरे यांच्या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
विधानसभा अध्यक्षांची निवड, विरोधी पक्ष नेत्याची घोषणा आणि राज्यपालांचं अभिभाषण यासाठी विधानसभेचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. यासाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सज्ज असून, आम्हाल कोणतीही चिंता नाही. अशी माहिती महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी वारंवार माध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडे शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यामुळे या तीनही पक्षांच्या आमदारांची एकूण संख्या १५४ एवढी आहे. याशिवाय अनेक अपक्ष आणि काही छोट्या पक्षांनी देखील आपला पाठिंबा या सरकारला देऊ केली आहे. त्यामुळे हा आकडा १६२ च्या देखील पुढे जाऊ शकतो. त्यामुळे १४५ हा बहुमताचा आकडा हे सरकार नक्कीच गाठेल अशी सर्वांना आशा आहे. दरम्यान, आज बहुमत सिद्ध झाल्यानंतर उद्या (रविवार) विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल. तसंच विरोधी पक्ष नेत्याची देखील घोषणा केली जाईल. याशिवाय उद्याच राज्यपालांचं अभिभाषण देखील होईल.
महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना शुक्रवारी हटवून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आता नव्या अध्यक्षांसमोरच हे सरकार आपलं बहुमत सिद्ध करणार आहे. याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Special openings for…
केसांची चांगली काळजी घेऊन, केसांना कंघी करून आणि चांगला शॅम्पू वापरल्यानंतरही अनेकांच्या केसांचे आरोग्य बिघडते.…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे("Lay Bhari" has…
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…