राजकीय

Uddhav Thackeray : ‘त्या’ कंपन्यांना टाळे ठोका; प्रदूषण थांबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कठोर आदेश

टीम लय भारी

कोल्हापुर० : कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषणाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून मंगळवारी झालेल्या एका बैठकीत हे प्रदूषण थांबवण्यासाठी कठोर आदेशच मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असलेली पंचगंगा नदी कंपन्यांमधून सोडल्या जाणऱ्या पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा व पंचगंगा नदीसाठी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करण्यात यावे, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शनिवारी झालेल्या बैठकीत केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर लगेच बैठक घेत, पंचगंगा नदीच्या प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या कंपन्यांना टाळे ठोका आणि जोपर्यंत सर्व नियमांचे पालन होत नाही तोपर्यंत हे टाळे काढू नका, असे आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले.

गेल्या अनेक वर्षापासून पंचगंगा नदी प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी वर्षा निवासस्थानी मंगळवारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला. बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबीटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

प्रदूषणाबाबत दर महिन्याला अहवाल देणार

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पंचगंगा नदी प्रदूषणावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि एमआयडीसी यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवणार आहे व दर महिन्याला अहवाल देणार आहे. मुख्यमंत्री सचिवालयामार्फतही यावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी चौथ्याच दिवशी घेतली बैठक

कोल्हापूर जिल्ह्याची पंचगंगा नदी ही हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. या प्रदूषणामुळे मोठ्या प्रमाणात जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे व नदीकिनारी असलेल्या गावातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे, असे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रश्नाबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी तातडीने चौथ्याच दिवशी ही बैठक घेतली.

अभिषेक सावंत

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

2 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

2 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

3 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

6 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

7 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

7 hours ago