लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी भाजपला शंभर जन्म घ्यावे लागतील. त्यांचा अनुभव दांडगा आहे. ते अनुभवी नेते आहेत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्लीमध्ये पत्रकारांनी पवार यांना सत्तास्थापनेबाबत विचारले होते. त्यावेळी पवारांनी ‘सत्ता स्थापनेबाबत शिवसेना भाजपाला विचारा’ असे विधान केले होते. यावरून पत्रकारांनी राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार हे काहीही चुकीचं बोलले नसल्याचे राऊत म्हणाले. राज्यात शिवसेनेच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि तेही शिवसेनेच्याच नेतृत्वात होईल, म्हणूनच पवार असे म्हणाले असल्याचं राऊत यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, शरद पवार माझे गुरू. पण पवारांची खरी लढाई ही भाजपाशी आहे. पंतप्रधानांच्या वक्तव्यांवरून भाजपानं काहीतरी शिकावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित नव्हता. त्यामुळे तो रद्द झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांचा अयोध्या दौरा रद्द झाला असं म्हणून कोणीही दिशाभूल करू नये, असंही राऊत म्हणाले. भाजपानं त्यांचा सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भाजपाच्या अंताची सुरूवात ही महाराष्ट्रातूनच होणार आहे. येत्या काळात भाजपाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल आणि त्याचं नेतृत्व हे शिवसेनाच करेल. शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच स्थिर सरकार स्थापन होईल आणि यासाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. आम्ही विधीमंडळात बहुमत सिद्ध करताना १७० जणांचा पाठिंबा दाखवून देऊ. राष्ट्रपती शासन हे सहा महिन्यांसाठी लागू झालं आहे. ते संपण्यापूर्वी राज्यात सरकार स्थापन होईल, असंही राऊत म्हणाले.
हे सुद्धा वाचा
सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक
दोन्ही काँग्रेसवर विसंबून राहिलेल्या शिवसेनेची अवस्था ‘हातचं सोडून पळत्याच्या मागे’
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…