लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादी पक्षाचा विधीमंडळ गटनेता या नात्याने अजित पवार यांनी भाजपच्या सोबतीने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन करण्याबाबत अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटरहेडवरील एक पत्र राज्यपालांना दिले आहे. त्यावर राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. परंतु हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारसाठी तयार केले होते. तेच पत्र अजितदादांनी पळवले आहे, व भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी या पत्राचा दुरूपयोग केल्याचे समोर आले आहे.
पत्राचा दुरूपयोग झाल्याचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनीही मान्य केले आहे. काही आमदारांनाही अजित पवार यांनी फसवून राजभवनात नेले होते. त्यातील काही आमदार आता शरद पवारांच्या घरी परतले आहेत. हे आमदार १२.३० वाजता शरद पवारांसोबत पत्रकार परिषदेत येतील, असे मलिक यांनी म्हटले आहे.
अजितदादा यांच्यासोबत राजभवनात शपथ घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सुमारे 12 आमदार गेले होते. यातील किती आमदार अजित पवार यांच्याबरोबर ठाम राहतील याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
दरम्यान, हे सरकार धोका देऊन बनलेले आहे. त्यामुळे ते टिकणार नाही. विधीमंडळाच्या पटलावर हे सरकार बहुमताअभावी पडेल, असा दावाही मलिक यांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा
सुप्रिया सुळे म्हणतात, कुटुंबात आणि पक्षातही फूट
काकाने पावसात कमविले, पुतण्याने रातोरात गमावले : सोशल मीडियावर फटकेबाजी
अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते गायब
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…