टॉप न्यूज

‘नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनविले, त्यामुळे मी देशाचा गुन्हेगार आहे’ : भाजपच्या माजी आमदाराने केली पोलखोल

टीम लय भारी

मुंबई : नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी ज्येष्ठ विधीज्ज्ञ कै. राम जेठमलानी यांनी कष्ट उपसले होते. परंतु ‘मोदींना पंतप्रधान बनविल्याचे मला दुःख होत आहे. मी देशाचा गुन्हेगार आहे’, अशी खंत कै. जेठमलानी यांनी आपल्या शेवटच्या काळात व्यक्त केली होती, अशा शब्दांत भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलखोल केली आहे ( Anil Gote wrote a letter to Narendra Modi) .

अनिल गोटे यांनी नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठविले आहे. यात मोदी यांच्या अपयशाचा व अवगुणांचा पाढाच गोटे यांनी वाचला आहे. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जेठमलानी यांनी खूप प्रयत्न केले होते. भाजपच्या कोअर बैठकांमध्ये त्यांनी मोदींचे नाव सतत पुढे केले होते. त्यासाठी जेठमलानी यांनी नितीन गडकरींची नाराजी ओढवून घेतली होती.

राम जेठमलानी यांच्या कार्यालयात अमित शाह सतत जायचे. कितीवेळ तिथे बसायचे. तुम्हाला पंतप्रधान बनविण्याची मोहिमच जेठमलानी यांनी घेतली होती. परंतु तुम्हाला पंतप्रधान बनविल्यानंतर जेठमलानी यांना पश्चाताप झाला होता ( Anil Gote says, Ram Jethmali was upset on Narendra Modi ). हा पश्चाताप जेठमलानी यांनी माझ्यासमोर व्यक्त केला होता, असे गोटे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप

गोपीचंद पडळकर – शरद पवार वादाच्या पार्श्वभूमीवर अनिल गोटेंचे भाजपवर खळबळजनक आरोप

गोपीचंद पडळकर यांच्यावर धनगर नेतेही संतापले

Anil Gote scathing on Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कपटी, नीच, दगलबाज, हृदयशून्य व्यक्ती

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर तुमची भाषणे ऐकली. तुमच्याशिवाय या देशाला तरणोपाय नाही अशी आमची खात्री झाली. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आलो. परंतु तुम्ही आम्हाला तेव्हा मुर्ख बनविले होते हे आता लक्षात येत आहे.

देशातील काळा पैसा परदेशी बँकांमध्ये आहे. तो परत आणणार असे आपण म्हणाला होता. लोकांच्या खात्यात १५ लाख रूपये येतील. तुमच्यामुळे गोरगरीबांना रोजी रोटी, कपडे मिळतील असे वाटले होते. पण हा चुनावी जुमला होता.

सन २०१४ च्या अगोदर तुम्ही पाकिस्तानच्या विरोधात जोरदार बोललात. पाकिस्तानी सैन्यांची मुंडकी आणू म्हणायचा. पण अजूनही एकही मुंडके तुम्ही आणलेले नाही. उलट तुमच्यामुळे भारतीय सैनिकांचे नाहक बळी जात आहेत. तुमच्यामुळे अनेक लेकी, सुना पोरक्या झाल्या. अनेक महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले, अशा कठोर शब्दांचा वापर गोटे यांनी केला आहे.

गोटे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही दुगाण्या झाडल्या आहेत. महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या इतिहासातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी होते. बेकायदा आदेश जारी करायचे, भ्रष्टाचारी आणि अनैतिक लोकांना सोबत घेऊन सरकार चालवायचे असे प्रकार फडणवीस यांनी केल्याचेही गोटे यांनी म्हटले आहे.

तुषार खरात

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

13 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

13 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

14 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

14 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

16 hours ago