‘शरद पवार यांचा पक्ष फोडण्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील’

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : शरद पवार हे लोकनेते आहेत. महाराष्ट्राचे व देशाचेही नेते आहेत. त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आदर आहे. पण त्यांचाच पक्ष फोडण्याचे काम भाजप करीत आहे. अजित पवारांना फोडण्याचा भाजपचा शेवटचा डाव होता. पण तो आता त्यांच्यावर उलटला आहे, अशी जहरी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपने अन्य पक्षांच्या आमदारांना गळाला लावले होते. पण ते सगळे निवडणुकीत पडले. अजितदादांना फोडणे हा शेवटचा डाव भाजपवर उलटला आहे. अजितदादांबरोबर २५ आमदार तरी जातील असे त्यांना वाटले होते. मात्र अजित पवारांबरोबर ४ – ५ आमदार आहेत. त्यातील काहीजण परत येण्याच्या तयारीत आहेत. अवघ्या ४ – ५ आमदारांच्या बळावर भाजपने अजित पवारांना मुख्यमंत्री केले. या वयात शरद पवारांच्या पाठीत अजित पवारांनी खंजीर खुपसला असल्याचेही राऊत म्हणाले.

भाजपकडे बहुमताचा आकडा आहे, तर काळोखात शपथ का घेतली. २०१४ मध्ये वानखेडे स्टेडीयममध्ये शपथ घेतली होती. तशी शपथ आता का नाही घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने शपथ घेतली, पण ही शपथ घेताना महाराष्ट्राच्या जनतेलाच ठाऊक नव्हते. भाजप खोटे बोलते. पण हा त्यांचा शेवटचा खोटेपणा आहे, हे विधानसभेत सिद्ध होईल. भाजपच्या नेत्यांनी मला काहीही धमक्या द्याव्यात. मी त्यांना घाबरत नाही, असे आव्हान खासदार राऊत यांनी दिले.

आमदार फोडाफोडीसाठी, विक्रीसाठी राज्यपालांनी भाजपला वेळ दिला

भाजपकडे बहुमत होते, तर ३० तारखेपर्यंत का थांबलात. राज्यपालांच्या नावात भगवान आहे. मी त्यांना भगवानाचा अवतार समजतो. पण त्यांनी आम्हाला एक न्याय, व त्यांच्या पक्षाला दुसरा न्याय दिला. आमदारांची फोडाफोडी करण्यासाठी व त्यांना विकत घेण्यासाठी राज्यपालांनी भाजपला संधी दिली. भाजपचे हे कारस्थान आणीबाणीपेक्षा वाईट आहे. नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला त्यांच्याच पक्षाचे नेते तडे देत आहेत. राज्यपालांनी आम्हाला बोलावावे. १० मिनिटांत आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू शकतो. हे त्यांनाही माहित आहे. आमच्याकडे १६५ आमदारांचे संख्याबळ आहे. अगोदर १७० होते, पण पाच आमदार अजित पवारांबरोबर गेल्याचे राऊत म्हणाले.

भाजप राजकारणातील व्यापारी

भाजपला राजकारणातला व्यापार कळतो, असे मला वाटले होते. पण यांत ते चुकले. व्यापार सचोटीने प्रामाणिकपणे केला असता तर भेसळीचे पदार्थ विकण्याची वेळ आली नसती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे सगळे आमदार आपापल्या ठिकाणी मजबूत आहेत. एकही आमदार फुटणार नसल्याचे राऊत यांनी ठणकावले.

भाजपचे चार कार्यकर्ते

सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स व पोलीस हे भाजपचे चार कार्यकर्ते आहेत, तर राज्यपाल भवन व राष्ट्रपती भवन हे त्यांचे राखीव खेळाडू आहेत. त्यामुळे भाजपने इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करू नये. आणीबाणीपेक्षाही भाजपचे हे कारस्थान वाईट आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

नव्या सरकारची थोड्याच वेळात न्यायालयात परीक्षा, कर्नाटकाप्रमाणे निकाल आल्यास भाजपसमोर डोकेदुखी

VIDEO : अजित पवारांनी फडणविसांना फसविले, फडणविसांनी राज्यपालांना फसविले

शरद पवारांसोबत ४८ आमदार, अजितदादांकडे उरले पाच जण

अजित पवारांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला, रात्री 9 वाजल्यानंतर झाले होते गायब

तुषार खरात

Recent Posts

तणावापासून मुक्ती मिळवायची आहे? तर दररोज करा हे 4 योगासने

आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…

2 hours ago

Sanjaymama Shinde यांच्या नावाने माढ्यातील ३६ गावांतील जनताही बोंब मारते | Vidhansabha 2024

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

2 hours ago

अजित पवार पळपुटे | शरद पवारांचा वारसा सुप्रिया सुळे, रोहित पवार चालवतील | Sanjaymama Shinde

कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…

2 hours ago

SanjayMama Shinde | आमदारांनी नक्की काय केले ? दिवे लावले, प्रकाश पाडला, पीएचडी – संशोधन केले ?

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…

3 hours ago

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर फेकू नका, अशा प्रकारे करा वापर

ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…

3 hours ago

ही काळ्या पिठाची पोळी खाल्याने लवकर वजन होणार कमी

पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…

3 hours ago