टीम लय भारी
मुंबई : दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी ठाकरे सरकारने अंधारातच ठेवली. शेतक-यांची दिवाळी काळी करणा-या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Fadanavis protests) यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर चौफेर टीका केली आहे.
शेतक-यांच्या विविध मागण्यांवरून जेलभरो आंदोलन करणारे वडनेराचे आमदार रवी राणा यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांना दिवाळीच्या दिवशी कारागृहातच रहावे लागत असल्याने, यावरून देखील फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. , असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी याबाबात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ”बळीराजा संकटात असताना त्याची दिवाळी अंधारात जाऊ नये, यासाठी सरकारकडे मागण्या करण्यात आल्या, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पण सरकार दाद द्यायलाच तयार नाही. बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे राहताना भाजपाने अनेक ठिकाणी बेसन-भाकर आंदोलन केले.”
तसेच, ”दीपोत्सवाचे पर्व साजरे होत असताना आपला बळीराजा मात्र मदतीविना संकटात आहे. त्याची दिवाळी या सरकारने अंधारातच ठेवली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, संत्र्याचे प्रचंड नुकसान झाले. बोंडअळीने कपाशी संपविली. मराठवाडा, विदर्भ आणि इतरही सर्व भागात हीच अवस्था! पण मदत द्यायला सरकार तयार नाही.” असे देखील फडणवीस म्हणाले आहेत.
जेलभरो आंदोलन करणा-या आमदार रवी राणा यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केल्याचा निषेधही फडणवीस यांना नोंदवला आहे. ”शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतक-यांची दिवाळी काळी करणा-या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो.” असं त्यांनी म्हटलं आहे.
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठं नुकसान झालेल्या शेतक-यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, लॉकडाउन काळातील वीज बिल माफ करा इत्यादी मागण्यांसाठी आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं. अमरावती- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत रोखून धरण्यात आला होता. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आमदार रवी राणांसह शेकडो कार्यकर्त्यांना अटक केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…