विराट कोहलीने बैठकीत काय झाले याची माहिती दिली
भारतीय संघाचा कप्तान विराट कोहली यानेच ही माहिती दिली ( Virat Kohli told that, there was discussion on #FarmersProtest in the team meeting ). बैठकीनंतर पत्रकारांनी कोहली यांना शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर संघाच्या बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चर्चा झाल्याचे विराट कोहलीने कबूल केले.
‘देशातील महत्वाच्या घडामोडींवर आमच्या बैठकांमध्ये चर्चा होत असते. शेतकरी आंदोलनाबाबतही खेळाडूंनी आपापली भूमिका मांडली. त्यानंतर सामन्याच्या ( IND vs ENG ) व्यूहरचनेबाबत चर्चा झाली’ – विराट कोहली
रिहाना ( Rihanaa ), ग्रेटा थनबर्ग ( Greta Thunberg ) अशा परदेशी सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट्स केले आहेत. या ट्विट्सना प्रत्युत्तर देण्याच्या अनुषंगाने व मोदी सरकारला फायदेशीर ठरतील असे ट्विट आजी माजी खेळाडूंनी केले आहेत.
सचिन तेंडूलकर, विराट कोहली, लता मंगेशकरांवर सोशल मीडियात टीकेचा भडीमार
नाना पटोलेंनी दिला विधानसभाध्यक्षपदाचा राजीनामा
IND vs ENG 1st Test LIVE: 11 महीने बाद भारत में होगी इंटरनेशल क्रिकेट की वापसी
IND vs ENG : Joe Root Says “Fantastic” Cheteshwar Pujara Will Be “Huge Wicket For Us”
विराट कोहली, रोहित शर्मा ( Rohit Sharma ), शिखर धवन ( Shikhar Dhawan ), अजिंक्य राहणे या विद्यमान खेळाडूंसह कोच रवी शास्त्री यांनी केंद्र सरकारच्या समर्थनार्थ ट्विटस् केले आहेत. त्यावर मोदी समर्थकांनी कौतुक केले. पण शेतकरी समर्थकांनी या खेळाडूंना सोशल मीडियात झोडपून काढले आहे.
रोहित शर्माचे ट्विट मोदी सरकारच्या समर्थनार्थ होते. तरीही कंगना रनौतने रोहितवर दुगाण्या झाडल्या ( Kangana Ranaut slams to Rohit Sharma ). कंगनाने रोहितसह सर्व क्रिकेटपटूंची संभावना ‘धोबी का कुत्ता…’ अशी केली. याच ट्विटमध्ये शेतकऱ्यांविषयी सुद्धा कंगनाने अतिरेकी असा उल्लेख केला. ‘ट्विटरने निश्चित केलेल्या आचारसंहिते’चे उल्लंघन होत असल्याने हे ट्विट डिलिट केल्याचे ट्विटरने नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर ( IND vs ENG ) खेळाडूंच्या बैठकीत गरमागरम चर्चा झालेली असू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विराट कोहलीने ( Virat Kohli ) शेवटच्या दोन कसोटी सामन्यांत रजा घेतली होती. दौऱ्यातील अन्य सामन्यांमध्ये विराट कोहलीने नेतृत्व केले होते. पण अन्य सामन्यांमध्ये रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) सहभाग नव्हता. शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये रोहित खेळला होता.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याअगोदर कोरोना काळात सर्व आंतरराष्ट्रीय सामने रद्द झाले होते. 29 जानेवारी 2020 रोजी भारत विरूद्ध न्यूझिलंड हा सामना झाला होता. या सामन्यात विराट व रोहित एकत्र खेळले होते.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सामन्यांत विराट व रोहित एकत्र खेळले नव्हते. त्यामुळे तब्बल 372 दिवसानंतर विराट व रोहित एकत्र खेळताना दिसणार आहेत ( Virat Kohli and Rohit Sharma playing together after 372 days in IND vs ENG match ). विराट व रोहित हे दोघेही जागतिक अव्वल खेळाडू आहेत. ते जेव्हा संघात एकत्र खेळतात तेव्हा जिंकण्याची शक्यता 8 टक्क्यांनी वाढते. त्या पार्श्वभूमीवर या दोघांच्याही खेळाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
भारत व इंग्लंड ( IND vs ENG ) यांच्यात पुढील तीन महिने मोठ्या संख्येने सामने होणार आहेत. तब्बल चार कसोटी, पाच T20 व तीन एक दिवसीय सामने दोन्ही संघात खेळले जाणार आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी मेजवानी ठरेल. चेन्नई, अहमदाबाद व पुणे या ठिकाणी हे सामने होतील.
IND vs ENG match starts from today
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…
विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…
लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…
'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…
सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…