टीम लय भारी
मुंबई : “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदरणीय चंद्रकांत पाटील यांच्या निष्ठांबाबत रोहित पवारांनी न बोललेलंच बरं. महाराष्ट्रात खंजीर खुपसणारे म्हणून कोण ओळखले जातात? याचा आधी शोध घ्यावा. त्यांनी मुळात निष्ठेविषयी बोलूच नये. शिवाय जे स्वतः पुण्यातून विधान परिषद मागायला भाजपा नेत्यांच्या पायऱ्या झिजवत होते त्यांनी चंद्रकांत पाटलांवर आक्षेप घ्यावा? आता तरी खरच राजकारण थांबवा. जनतेला अजून पाच पैश्याची सुद्धा मदत केली नाहीं त्यावर बोला,” अशी टीका राम कदम यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. राोहित पवारांना भाजपानं प्रत्युतर दिलं असून टीका करताना शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. सरकार स्थापनेसाठी शिवसेनेसोबत जाऊ, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरून रोहित पवारांनी पाटील यांना टोला लगावला होता. आता रोहित पवारांवर भाजपाचे आमदार राम कदम यांनी टीका केली असून, शरद पवारांनाही लक्ष्य केलं आहे.
रोहित पवार काय म्हणाले होते….
“आजही शिवसेनेसोबत जाण्यास तयार असल्याचं भाजपातील एक मोठे नेते म्हणाले. सत्तेत येण्याची त्यांची घाई बघता ५ वर्षात भाजपापासून सोशल डिस्टन्स ठेवत अनेक इच्छुक असले, तरी किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या,असं म्हणून त्यांनीच शिवसेनेत प्रवेश केला नाही म्हणजे झालं! आतातरी राजकारण थांबवा!,” असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.
घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस धरण्यात आले…
पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…
मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…
शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…
पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…