टीम लय भारी
मुंबई : मुंबई पोलिसांनी विनाकारण दुचाकी, चारचाकीने रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला (Mumbai Police Action on Violating Curfew) आहे. राज्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही थिथीलता देण्यात आल्या आहे. मात्र याचा गैरफायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. अशा लोकांवर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली असून वाहनं जप्तीची कारवाई सुरु झाली.
अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा किंवा कार्यलयीन कामाव्यतिरिक्त जर कोणी विनाकारण फिरताना आढळले तर त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. (Mumbai Police Guidelines Action on Violating Curfew during Unlock) मुंबईत अनलॉक झाल्यानंतर अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी विनाकारण बाईक किंवा मोटारसायकलवरुन फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहे. त्यानुसार पोलिसांना विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर अनेक मुंबईकर कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत होते. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईनंतर त्यांना चांगलाच वचप बसेल, असं बोललं जात आहे.
राज्य सरकारतर्फे ‘Mission Begin Again’ अंतर्गत अनेक परवानग्या दिल्या आहेत. कोविड -19 चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी Personal Safety आणि Social Distancing च्या नियमांचे पालन करावे.
अनेकजण या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
काय आहे मुंबई पोलिसांची नियमावली…
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…