सावधान : विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई!

टीम लय भारी

मुंबई : मुंबई पोलिसांनी विनाकारण दुचाकी, चारचाकीने रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला (Mumbai Police Action on Violating Curfew) आहे. राज्यात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात काही थिथीलता देण्यात आल्या आहे. मात्र याचा गैरफायदा घेत विनाकारण घराबाहेर पडत आहे. अशा लोकांवर मुंबई पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली असून वाहनं जप्तीची कारवाई सुरु झाली.

अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा किंवा कार्यलयीन कामाव्यतिरिक्त जर कोणी विनाकारण फिरताना आढळले तर त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. (Mumbai Police Guidelines Action on Violating Curfew during Unlock)  मुंबईत अनलॉक झाल्यानंतर अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी विनाकारण बाईक किंवा मोटारसायकलवरुन फिरताना आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल केला जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहे. त्यानुसार पोलिसांना विनाकारण  रस्त्यावर भटकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. लॉकडाऊनमधून सूट मिळाल्यानंतर अनेक मुंबईकर कामाव्यतिरिक्त रस्त्यावर फिरताना पाहायला मिळत होते. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईनंतर त्यांना चांगलाच वचप बसेल, असं बोललं जात आहे.

राज्य सरकारतर्फे ‘Mission Begin Again’ अंतर्गत अनेक परवानग्या दिल्या आहेत. कोविड -19 चा धोका अजूनही कायम असल्याने सर्वांनी सुरक्षेसाठी Personal Safety आणि Social Distancing च्या नियमांचे पालन करावे.

अनेकजण या नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी राज्य शासनाने जारी केलेल्या लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.

काय आहे मुंबई पोलिसांची नियमावली…

  1. घराबाहेरील हालचाली केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच कराव्यात.
  2. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
  3. घरापासून फक्त 2 कि.मी.च्या परिसरात असलेल्या बाजारपेठ, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. 2 कि.मी. च्या बाहेर जाऊ नये.
  4. व्यायामाची परवानगी घरापासून 2 कि.मीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.
  5. कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत 2 कि.मी च्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.
  6. Social Distancing च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
  7. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
  8. Social Distancing चे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.
  9. रात्री 09. 00 ते पहाटे 05.00 वा. दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनी बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.
  10. वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील. (Mumbai Police Guidelines Action on Violating Curfew during Unlock)

राजीक खान

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

13 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

13 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

14 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

15 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

15 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

17 hours ago