टीम लय भारी
नवी दिल्ली : देशात करोनाचा कहर वाढतच चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येने ३ लाखांच्या पुढे गेली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र आणि दिल्लीतही करोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. १६ आणि १७ जून रोजी दुपारी ३ वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी ते दोन टप्प्यांमध्ये संवाद साधणार आहेत. दरम्यान, या बैठकीअंतर्गत १७ जून रोजी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधणार आहे. देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता २४ मार्च रोजी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाउनमध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली होती. तसंच ८ जूनपासून अनलॉक १ अंतर्गत काही प्रमाणात सुट देण्यास सुरुवात करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या बैठकीत सर्व प्रथम सर्व राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. तसंच अनलॉक १ अंतर्गत काही प्रमाणात सुट देण्यात आली, त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची समिक्षाही करण्यात येऊ शकते. याव्यतिरिक्त राज्यांमधील परिस्थितीत सुधारण्याकरिता काही सूचनाही करण्यात येऊ शकतात. देशातील वाढती आकडेवारी लक्षात घेता लॉकडाऊनमध्ये जी शिथीलता देण्यात आली त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…