टीम लय भारी
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आरोग्य विभागाकडे लक्ष देण्याची गरज जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण मंत्री राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून प्रथामिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. जितेंद्र आव्हाड यांनी तसे आदेश दिले आहेत. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे की, “यापुढे एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पामध्ये झोपडपट्टी धारकांच्या प्रकृतीची काळजी म्हणून १००० ते ५००० स्क्वेअर फूटांचं प्रथामिक आरोग्य केंद्र (मोफत एफएसआयच्या धर्तीवर) बांधण्याचा निर्णय एसआरएने घेतला आहे. तसे आदेश मी पारित केले आहेत”.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४६ हजार ७८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर करोना रुग्णांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ९७ हजार ६४८ झाली आहे. गुरुवारी ३६०७ रुग्ण आढळणं ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी संख्या आहे.
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…