टीम लय भारी
औरंगाबाद l बिहार विधानसभेत एनडीएला काटावर बहुमत मिळालं असून आपण हा त्यांचा विजय मानत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ईव्हीएमवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही टीका केली.
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान दंगली घडवण्याचा डाव होता असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर केला आहे. बिहारमधील एनडीएचा विजय आपल्याला मान्य नसल्याचंही ते म्हणाले आहेत. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
“बिहार विधानसभा निवडणुकीत फायदा करुन घेण्यासाठी दंगली घडवण्याचा भाजपाचा डाव होता. पण भाजपाचा हा डाव आम्ही पूर्ण होऊ दिला नाही,” असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. बिहार विधानसभेत एनडीएला काटावर बहुमत मिळालं असून आपण हा त्यांचा विजय मानत नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी ईव्हीएमवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगावरही टीका केली.“बिहारमध्ये पप्पू यादव यांच्यासाठी आपण सभा घेतल्या. सभेला १० हजारापर्यंत लोक उपस्थित असायचे. करोना संकटात पप्पू यादव यांनी खूप मदत केल्याचं स्थानिकांनी सांगितलं.
मग अशावेळी ती व्यक्ती चौथ्या क्रमांकावर कशी काय फेकली जाऊ शकते?,” अशी शंका प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केली. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत पेपर छापणे आणि ते केंद्रापर्यंत पोहोचवणे एवढंच काम करत असल्याची टीका केली.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…