टीम लय भारी
मुंबई : गोरेगाव येथील आरेची 600 एकर जागा ही वनासाठी राखीव आहे. परंतु या जागेवर तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मेट्रो 3 साठी कारशेडचे काम सुरु केले होते. तो निर्णय महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने रद्द केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन, आम्ही शब्द पाळला असे म्हटले आहे.
आरेच्या जंगलातील दोन हजार झाडांची कत्तल करुन मेट्रो कारशेडचे काम फडणवीस सरकारच्या कार्यकाळात सुरु होते. त्याबाबत निसर्गप्रेमींसह शिवसेना,राष्ट्रवादी, काँग्रेसने आक्षेप घेतला होता. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तो फडणवीसांना दणका दिला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला.
ना. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन आमच्या सरकारने शब्द पाळल्याचे म्हटले. आपण आंदोलनावेळी तुरुंगात गेलो होतो, याची आठवणही करुन दिली. तसेच सर्व वृक्षप्रेमींनी महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं.
कडक पाणी म्हणजे कठीण पाणी. या पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे खूप जास्त प्रमाणात…
व्यायाम, योग करणे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचे आहे. व्यायामाशिवाय आपले शरीर निरोगी राहत नाही. शिवाय,…
आजच्या काळात लोकांना नोकरीमुळे आपल्या शरीराकाडे लक्ष्य देता येत नाही. त्यामुळे त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(What went wrong…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Man - A…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक, पाणीदार आमदार हा किताब लावून घेतलेला आहे(Jayakumar Gore has…