टीम लय भारी
मुंबई :- महाराष्ट्र राज्य विधिमंडळांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी सांगितले की, कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासाठी अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला आणि सभागृहातील सर्व सहकाऱ्यांना सांगितले आहे की मास्क लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सतत हात धुणे या त्रिसूत्रांचे पालन केले पाहिजे असे अजित पवारांनी सांगितले आहे.
अजित पवार म्हणाले की, काही विरोधी पक्ष नेते म्हणतात की, मी मास्क लावत नाही आणि लावणार देखील नाही परंतु तुम्ही मास्क लावणार नाहीत पण त्यामुळे दुसऱ्या लोकांना त्यांचा त्रास देखी होऊ शकतो असे म्हणत अजित पवारांनी राज ठाकरे यांना फटकारले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे की, तुम्हाला कोरोना झाला नाही कारण तुमची रोग परतिकारशक्ती चांगली आहे म्हणून तुम्हाला कोरोना झाला नाही.
अजित पवार म्हणतात की, मला एका गोष्टीचे विशेष वाटते ते म्हणजे मुख्यमंत्री, प्रविण दरेकर आणि सभापती या तिघांना देखील अजून कोरोना झाला नाही. परंतु बाकी सर्वांना कोरोना झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोना झाला होता. तसेच आता देखील मंत्री मंडळातील ७-८ मंत्री कोरोना ग्रस्त आहेत. तसेच त्यात काही दोन्ही बाजूचे आमदार देखील कोरोना ग्रस्त आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…