छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य टिकविण्यामध्ये संताजी घोरपडे यांचं फार मोठं योगदान आहे. संताजी घोरपडे यांची सातारा जिल्ह्यातील कारखेल (ता. माण) या ठिकाणी समाधी आहे(Santaji Ghorpade, who fought for Hindu Swarajya, was killed at this place). ही समाधी निष्ठा आणि गद्दारीचं प्रतिक आहे. ‘लय भारी’ने टीमन या समाधी स्थळाला, तसेच ज्या ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारले त्या ठिकाणांना भेट दिली. मराठा साम्राज्यातील गद्दार सरदार नागोजी माने याने याच ठिकाणी संताजी घोरपडे यांना मारलं होतं. संताजी घोरपडे हे आयुष्यभर स्वराज्यासोबत एकनिष्ठ राहिले. त्यांनी कधीही गद्दारी केली नाही. उलट नागोजी माने हे कधी मराठ्यांसोबत तर कधी औरंगजेबासोबत राहिले. संताजी घोरपडे हे सकाळच्या वेळी सूर्याला अर्ध्य अर्पण करीत असताना नागोजी माने यांनी विश्वासघाताने संताजी घोरपडे यांच्यावर वार केला. त्यानंतर त्यांचे शीर कापून ते भाल्यावर खोचले, अन् औरंगजेबाच्या दरबारात नेले. या दोन्ही ठिकाणी ‘लय भारी’ची टीम पोचली. संताजी घोरपडे यांचा जाज्वल्य इतिहास मराठी जनतेला सांगण्याचा प्रयत्न ‘लय भारी’ने केला आहे.
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…
आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…
PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…