निवडणूक

नाशिक लोकसभा मतदार संघातून दिनकर पाटील यांनाच उमेदवारी द्यावी; सातपूर मंडलाच्या बैठकीत मागणी

खासदार श्रीकांत शिंदे यांनी चुकीच्या पद्धतीने हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित केली आहे.शहरात तीन आमदार असल्याने नाशिक लोकसभा मतदार संघ भाजपाला सोडण्यात यावा. आणि माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनाच उमेदवारी देण्यात यावी.अशी एकमुखी मागणी सातपूर भाजपा मंडलाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीच्या बैठकीत केली आहे.भाजपा मंडलाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष रामहरी संभेराव,महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी बोलकर,मंडल अध्यक्ष भगवान काकड,सिडको मंडल अध्यक्ष रवी पाटील,उपाध्यक्ष संदीप तांबे तसेच रवींद्र धिवरे,राजेश दराडे,रवींद्र जोशी,शिवाजी शहाणे यांनी मनोगत व्यक्त केले.शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे नाशिक दौऱ्यावर आले असता नाशिक लोकसभा मतदार संघाचा उमेदवार म्हणून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव घोषित केले.

खरे तर त्यांना उमेदवारी घोषित करण्याचा अधिकारच नाही. नाशिक लोकसभा मतदार संघासाठी भाजपाकडे दिनकर पाटील सारखा सक्षम उमेदवार आहे.त्यांनी संपूर्ण मतदारसंघात भाजपा घराघरात पोहोचविली आहे.ग्रामीण भागातील जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी ग्रामीण भागातील जनतेची देखील मागणी आहे.शिवाय मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे.तीन आमदार आहेत.त्यामुळे हा मतदार संघ भाजपालाच सोडण्यात यावा.अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने हेमंत गोडसे यांना निवडून आणले आहे. गेल्या 10 वर्षात त्यांनी काहीही कामे केलेली नाहीत.तरीही गोडसे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाहीत.त्यामुळे ते पराभूत होतील.मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी दिनकर पाटील यांनाच उमेदवारी द्यावी.अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी संजय राऊत,युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके,युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील,गणेश बोलकर,रवींद्र जोशी,प्रवीण पाटील, अशोक जाधव, नारायण जाधवउदय बोरसे, योगेश मालुंजकर आदिंसह पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

मतदारसंघात भाजपा घराघरात पोहोचविली आहे.ग्रामीण भागातील जनतेची कामे केली आहेत. त्यामुळे त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी ग्रामीण भागातील जनतेची देखील मागणी आहे.शिवाय मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे.तीन आमदार आहेत.त्यामुळे हा मतदार संघ भाजपालाच सोडण्यात यावा.अशी एकमुखी मागणी करण्यात आली आहे.मागील दोन्ही निवडणुकीत भाजपाने हेमंत गोडसे यांना निवडून आणले आहे.गेल्या 10 वर्षात त्यांनी काहीही कामे केलेली नाहीत.तरीही गोडसे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाहीत.त्यामुळे ते पराभूत होतील.मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी दिनकर पाटील यांनाच उमेदवारी द्यावी.अशी आग्रही मागणी करण्यात आली.यावेळी संजय राऊत,युवा मोर्चा अध्यक्ष गौरव बोडके,युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील,गणेश बोलकर,रवींद्र जोशी,प्रवीण पाटील, अशोक जाधव, नारायण जाधवउदय बोरसे, योगेश मालुंजकर आदिंसह पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

‘मराठी भाषेचे सीमोल्लंघन व्हावे’, सत्यजित तांबेंची CM एकनाथ शिंदे यांना विनंती

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य सत्यजित तांबे यांनी देशातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात मराठी…

1 day ago

उपवासात करा ‘या’ फळांचे सेवन, त्वरित मिळणार ऊर्जा

7 सप्टेंबर 2024 हा दिवस भारत देशात खूप महत्वाचा मानला जाणारा आहे. याच दिवशी आपले…

2 days ago

पावसाळ्यात ‘अशी’ घ्या आपल्या त्वचेची काळजी

पावसाळा सुरु झाला असून, गर्मीमुळे काही सुटका झाली नाही. आता सुद्धा खूप जास्त गर्मी होत…

2 days ago

Ajit Pawar | अजित पवारांना सोम्यागोम्याच्या टपल्या

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(BJP workers publicly expressed their displeasure).…

2 days ago

Ajit Pawar | Pankaja Munde | पंकजा मुंडेंसमोर भाजप कार्यकर्त्यांचा संताप, अजित पवारांसाठी डोकेदुखी

भाजपने पंकजा मुंडे यांच्याकडे पुण्यातील काही मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे(Anger of BJP workers in front…

2 days ago

Sharad Pawar यांनी सांगितले, रामशेठ ठाकूर यांचे १०० कोटींचे महात्म्य ! Ramsheth Thakur

शरद पवार(sharad pawar) आज सातारा जिल्ह्यातील दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळे राजकीय पक्ष व…

2 days ago