शिक्षण

वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा (Board exams) घेण्यासाठी ‘लॉजिस्टिक्स्‌’वर काम करावे, यासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे (सीबीएसई)  विचारणा केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘सीबीएसई’ला दिलेल्या सूचनेवरून पुढील वर्षी म्हणजेच २०२५-२६ पासून वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा (Board exams) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि ‘सीबीएसई’ यांच्यामार्फत पुढील महिन्यात मुख्याध्यापकांसमवेत वर्षातून  दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात सल्लामसलत करण्यात येणार आहे.(Board exams to be held twice a year)

नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (२०२०) अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सत्र अभ्यासक्रम पद्धतीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने आता लवकरच ‘सीबीएसई’मार्फत वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील आराखडा तयार करण्यात येणार आहे.पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ न देता बोर्डाच्या दुसऱ्या परीक्षेला कसे सामावून घेता येईल, त्यासाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची रचना कशी करावी, याची पद्धती तयार करण्याच्या प्रक्रियेवर सध्या ‘सीबीएसई’ काम करत आहे. वर्षातून दोनदा परीक्षा कशी घेता येईल, यावर ‘सीबीएसई’ने काम करावे, अशा सूचना शिक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत. सत्र परीक्षा घेण्याचे कोणतेही नियोजन नाही.

बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

१) ओपन बुक परीक्षा पद्धती : विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत पुस्तक घेऊन परीक्षा देता येईल. पण, परीक्षेतील प्रश्नांची काठिण्य पातळी जास्त राहील. विद्यार्थ्यांना उत्तर पाहून लिहिताना स्वत:चा सविस्तर अभ्यास परीक्षेपूर्वी करावाच लागेल असा हा पॅटर्न असणार आहे.

२) सेमिस्टर पॅटर्न : दहावी व बारावीच्या परीक्षा आता वर्षातून एकदाच नव्हे तर दोन सेमिस्टरमध्ये होतील. पदवी, पदव्युत्तरच्या धर्तीवर भविष्यात दिवाळीपूर्वी एक तर उन्हाळ्यापूर्वी एक सेमिस्टर होईल. अजून त्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही, पण भविष्यात काळानुसार हा बदल होवू शकतो.

टीम लय भारी

Recent Posts

नाशिकरोडच्या गोसावी वाडीत टोळक्याची दगडफेक

गाडी जोरात चालवू नको इथे लहान मुले खेळतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे असे सांगितल्याचा…

7 hours ago

नाशिकमध्ये गळ्यात टोमॅटो, कांद्याची माळ घालून मतदान

राज्यात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान (votes) होत आहे. यामध्ये नाशिकमध्येही मतदान पार पडतंय.…

8 hours ago

उन्हाळ्यात कोहळा ( सफेद पेठा ) खाण्याचे फायदे

कोहळा (Ash Gourd ) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. आयुर्वेदानुसार कोहळा…

9 hours ago

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…

12 hours ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

13 hours ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

15 hours ago