क्राईम

अधिकाऱ्याने घेतली तब्बल ८.५ लाखाची लाच…

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला तब्बल साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले आहे.

वैजापूर येथे जलसंधारण विभागाचा उपविभागीय अधिकारी असलेला ऋषिकेश देशमुख या लाचखोर अधिकाऱ्याने हे कृत्य केले असून, त्याला गुन्हे शाखेच्या वतीने अटक करण्यात आली आहे. अन्य एका कारवाईत गंगापूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau, Maharashtra) भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षकाला ३० हजारांची लाच घेताना पकडले होते. (Government officer Rishikesh Deshmukh arrested in Aurangabad by Maharashtra ACB for accepting bribe)

एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हे जलसंधारण विभागात वैजापूर येथे उपविभागीय अधिकारी आहेत. जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली होती. मात्र तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने एसीबीकडे तक्रार केली होती. एसीबीने सापळा रचून देशमुखला साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना अटक केली.

चौडेश्वरी कंट्रक्शन्स, परभणी या कंपनीच्या नावावर कोल्हापुरी बंधाऱ्याचे गवळी पिंपळी ता. सोनपेठ जि. परभणी येथील कामाचे देयक १८ लाख आणि गोविंदपूर, ता. पूर्णा, जि. परभणी येथील कामाचे देयक एक कोटी १९ लाख असे दोन्ही कामाचे मिळून तक्रारदाराचे एकूण एक कोटी ३७ लाख रुपयांचे देयक बाकी होते. हे सर्व देयक काढण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे साहेब यांच्यासाठी ७.५ टक्के प्रमाणे म्हणजेच ८ लाख ३ हजार २५० आणि स्वतःसाठी व महामंडळ कार्यालयाचे मिळून ५० हजार असे एकूण ८ लाख ५३ हजार २५० रुपयांची मागणी देशमुख यांनी केली होती. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनंतर एसीबीने सापळा रचला आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ, औरगाबाद कार्यालयासमोर देशमुख आणि जलसंधारण महामंडळ कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत भाऊसाहेब दादाराव गोरे या दोघांना रंगेहात पकडण्यात यश आले.

गंगापुरातील ‘भूमी अभिलेख’ प्रकरण काय?

गंगापूर येथील कारवाईत भूमी अभिलेख विभागातील उप अधीक्षकाला लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयात उप अधीक्षक साळोबा लक्ष्मण वेताळ (५१) कार्यरत आहे. तक्रारदाराने आपली शेती मोजणी करण्यासाठी गंगापूरच्या भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. मात्र जमीन मोजण्यासाठी साळोबा वेताळ यांनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने सापळा रचून पंचासमक्ष ३० हजार रुपये घेताना साळोबा लक्ष्मण वेताळ याला रंगेहात पकडले. वेताळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team Lay Bhari

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

1 hour ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

2 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

2 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

3 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

3 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

3 hours ago