मनोरंजन

बॉलिवूड आता फक्त पंजाबी गाण्यांच्या जोरावर !

विकी कौशल आणि कियारा अडवाणी एका नवीन डान्स नंबरसह पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतले आहेत. हार्डी संधू आणि बी प्राक यांचे पंजाबी गाणे ‘क्या बात है 2.0’ तनिष्क बागचीने रिक्रिएट अर्थात नव्याने तयार केले आहे. गाण्याची सुरुवात कियाराने साखळदंडात बांधलेल्या विकीला सोडल्याने होते आणि ते दोघे मादक तालावर एकत्र नाचतात. या गाण्यामध्ये विकी कौशल आणि कियाराचा उत्तम केमिस्ट्री असलेला डान्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण इथे विकी आणि कियाराने किती छान डान्स केला आहे हे सांगण्याचा आमचा हेतू नाही तर बॉलीवूडमध्ये गेल्या काही वर्षात विनाकारण काही पंजाबी गाण्यांचा समावेश करून या चित्रपटाला एक वेगळेच रूप देण्याचा प्रयत्न सध्या केला जात असल्याचे दिसून येत आहे.

खरे तर गेल्या काही वर्षांपासून असे अनेक चित्रपट बनत असल्याचे आपण पाहत आहोत, ज्यामध्ये पंजाबी गाणी जोडण्यात आली आहेत. या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. हा आजचा मुद्दा नाही. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये अनेक पंजाबी गाणी अशी आहेत जी रिक्रिएट केली जात आहेत. विशेषत: पंजाबी गाणी हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. पूर्वी काही निवडक चित्रपट असे होते ज्यामध्ये जुनी गाणी रिमिक्स केली जायची किंवा अल्बमची गाणी बनवली जायची. पण आता अशी फॅशन झाली आहे की हे केले नाही तर चित्रपट चालणार नाही, असा समजच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

आजकाल बनत असलेल्या सर्व चित्रपटांमध्ये पंजाबी गाण्याचे रिमिक्स नक्कीच आहे. याचा अर्थ काय किंवा कारण काय ? ही गाणी पुन्हा बनवल्यास त्यात लोकांना काय नवीन दिसेल ! इतर प्रत्येक चित्रपटात त्यांना हे करायला भाग पाडलं जातं आहे. असे करून निर्मात्यांना काय सांगायचं आहे हे कळत नाही. विकी कौशल आणि कियारा अडवाणी यांचे नवीन गाणे क्या बात है आज रिलीज झाले. दोघांनीही त्यात आपले ग्लॅमर जोडले आणि गाण्यात संगीत जरा जोरात केले. आपण कोणता प्रेक्षक शोधत आहात हे देखील आपल्याला समजत नाही, असेच आता दिसून येऊ लागले आहे.

अशी अनेक गाणी आहेत जी पुन्हा तयार केली गेली आहेत आणि पुन्हा रिलीज झाल्यानंतर त्यांच्या चित्रपटाची मौलिकता गमावली आहे. चित्रपट कितीही चांगला असला तरी, तुम्ही गाणे का रीक्रिएट केले म्हणून कधी ना कधी तुम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. विकी कौशल चांगला अभिनेता आहे. त्यांनी असेच केले तर फॅन्सचा त्यांच्यावर कसा विश्वास बसेल ? याचा विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

12 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

12 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

13 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

13 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

14 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

16 hours ago