सुष्मितानं तिच्या ब्रेकअपची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली होती. आता ब्रेकअपनंतर तिची इन्स्टाग्रामवरील पहिली पोस्ट सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. या पोस्टवरून सुष्मिता आणि रोहमन यांच्यात बरेच वाद होते असा अंदाज लावला जात आहे. सुष्मितानं इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. पण या फोटोला तिनं दिलेल्या कॅप्शननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिनं लिहिलं, ‘शांतता सर्वात सुंदर आहे. माझं तुम्हा सर्वांवर खूप प्रेम आहे.’ या कॅप्शनसोबतच तिने स्माइलचा इमोजी पोस्ट केला आहे.
ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार ‘हे’ चित्रपट
सुष्मिताचा बॉयफ्रेंड रोहमन त्याच्या मित्राच्या घरी शिफ्ट झाल्यानंतर या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या. त्यानंतर सुष्मितानं इन्स्टाग्रामवर रोहमनसोबतचा एक फोटो शेअर करत आपल्या ब्रेकअप माहिती दिली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ‘आमचं नातं मैत्रीपासून सुरू झालं होतं. आम्ही आजही मित्र आहोत. रिलेशनशिप बऱ्याच काळापूर्वी संपली होती. पण प्रेम अजूनही बाकी आहे.’
Attack : जानेवारीत होणार ‘अटॅक’! जॉन अब्राहमच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे टिझर रिलीज
Sushmita Sen Says ‘Peace Is Beautiful’ After Announcing Break-Up With Ex Rohman Shawl
सुष्मिताच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी सुष्मिता आणि रोहमनच्या मैत्रीचं कौतुक केलं आहे. सुष्मिता आणि रोहमन यांची जोडी सोशल मीडियावर बरीच लोकप्रिय होती. हे दोघंही लवकरच लग्न करतील असं बोललं जात होतं. सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात जवळपास १० वर्षांचं अंतर होतं. मात्र तरीही त्यांच्यातील बॉन्डिंग नेहमीच चांगलं होतं. एवढंच नाही तर रोहमन सुष्मिताच्या मुलींना स्वतःचं कुटुंब मानत होता. दरम्यान अद्याप या दोघांचं ब्रेकअप का झालं याचा खुलासा झालेला नाही.
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…
ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…