आरोग्य

शिजवलेलं अन्न किती काळ फ्रिजमध्ये ठेवावं? जाणून घ्या

उन्हाळा सुरु झाला की, गृहिणी शिल्लक राहिलेलं अन्न खराब होऊ नये म्हणून फ्रिजमध्ये ठेवतात. पण तज्ज्ञांच्या मते फ्रिजमध्ये स्टोअर केलेले अन्न खाणे योग्य नाही. जास्त काळ फ्रिजमध्ये जेवण राहिले तर फूड पॉईझनिंगचा धोका वाढतो. कधी कधी काही पदार्थांचा रंग आणि स्वाद बदलत नाही, त्यामुळं गृहिणींचा मोठं गोंधळ उडतो. चांगल आहे की खराब असा अनेकदा प्रश्न पडतो. या घोळात फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खाल्ल जातं. पण..हे शिजवलेलं अन्न किती काळ फ्रिजमध्ये ठेवावं यालाही मर्यादा आहे. (Health care How long should you store cooked food in fridge)

रेफ्रिजरेशन दरम्यान तुम्ही जर शिजलेले अन्न एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवले तर हे अन्न एक – दोन दिवस ते जास्तीत जास्त आठवडा योग्य ठरते.

उकडलेल्या आणि शिजवलेल्या भातामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हे १-२ दिवसात संपवावे. भारतीय पदार्थांमधील आंबट, खारट आणि मसाले हे फ्रिजमध्ये ठेवणे योग्य ठरते.

अंडे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी हे पदार्थ लवकर खराब होणारे आहेत. त्यामुळे हे पदार्थ नेहमी रेफ्रिजरेटमध्ये ठेवावेत. मात्र आठवड्याच्या आत या पदार्थांचे सेवन करावे. तज्ज्ञांनुसार फ्रिजमध्ये ठेवलेल्या पदार्थांत २-३ दिवसात बॅक्टेरिया जमू लागतात. त्यामुळे अधिक काळ ठेऊ नये.

कोणतेही फळ कापल्यानंतर ६ ते ८ तासानंतर खाऊ नये. फ्रिजमध्ये शिजवून ठेवलेल्या भाज्या या २४ तासांच्या आत खाव्या अन्यथा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जास्त झालेला भात तुम्ही फ्रिजमध्ये ठेवल्यास, दोन दिवसांच्या आत संपवावा. मळलेली कणीक फ्रिजमध्ये २४ तासांपेक्षा अधिक ठेऊ नये. यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊन कणीक आंबट होते.

धनश्री ओतारी

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

6 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

6 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

7 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

10 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

11 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

11 hours ago