‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’चा लाभ आता महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला मिळू शकणार आहे. यापूर्वी पिवळ्या व केसरी रेशनिंग कार्डधारकांनाच या योजनेचा लाभ मिळत होता. आता तो पांढऱ्या कार्डधारकांनाही मिळणार आहे. या निर्णयामुळे कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे.
या योजनेत तब्बल 1200 आजारांचा समावेश आहे. राज्य सरकारने ( Mahavikas Aghadi ) सूचित केलेल्या निवडक 1000 रूग्णालयांमध्ये भरती होणाऱ्या प्रत्येक रूग्णाला पूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार आहेत. आपल्या राज्यातील नागरिकांना इतका मोठा लाभ देणारे जगात कोणतेही राज्य नाही. महाराष्ट्र हे जगातील पहिले राज्य ठरले आहे.
‘कोरोना’ची परिस्थिती बिकट झाली आहे. लोकांकडे उपचारासाठी पैसे नाहीत. खासगी रूग्णालये रूग्णांची पिळवणूक करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची बिकट स्थिती लक्षात घेऊन ( Mahavikas Aghadi ) सरकारने हा निर्णय घेतला आहे.
ही मोफत सुविधा 31 जुलैपर्यंत लागू राहणार आहे. परंतु ‘कोरोना’ची परिस्थिती नियंत्रणात आली नाही, तर त्याला आणखी मुदतवाढ दिली जाऊ शकते असे ( Mahavikas Aghadi ) सूत्रांनी सांगितले.
असा निर्णय घेण्याबाबत पहिला विचार आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मनात आला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा यांना या याबाबत माहिती दिली. ठाकरे व अजितदादांनी त्यास संमती दर्शवून तात्काळ प्रस्ताव पाठविण्यास सांगितले.
त्यानुसार राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी हा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावावर आरोग्य सचिव, राजेश टोपे यांच्या स्वाक्षरी झाल्या. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. परंतु लोकांच्या हिताची ही योजना असल्यामुळे अजितदादांनी चक्क एका मिनिटातच फाईलवर स्वाक्षरी केली.
ही बातमी टाईप करीत असताना प्रस्तावाची फाईल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर होती. थोड्या वेळातच किंवा सकाळपर्यंत ठाकरे यांची फाईलवर स्वाक्षरी होईल. त्यानंतर उद्या त्याबाबतचा आदेश (जीआर) जारी होईल असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊँट फॉलो करा
हे सुद्धा वाचा
CET Result : आदित्य ठाकरेंच्या सुचनेमुळे सीईटीचा निकाल उद्या जाहीर होणार
सलग दहा वर्षांपासून नाशिकचे खासदार राहिलेले हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या संपुर्ण कुटुंबियांच्या नावे एकूण…
दिंडोरी लोकसभा (Dindori Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवारांच्या संपत्तीत (wealth)…
४० अंशाच्या आसपास तापमानाचा पारा असतानाही कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह पाहता महायुतीच्या दाेन्ही उमेदवारांचा विजय जवळजवळ…
लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी शिवसेना-भाजप महायुतीतर्फे (BJP alliance ) दिंडोरी मतदार संघासाठी डॉ. भारती पवार आणि…
लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…
अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…