लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे आणि नाशिकच्या जागांसाठी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा बुधवारी करण्यात आली(The Shiv Sena has so far fielded candidates on 15 seats in Maharashtra). त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून महायुतीमध्ये जागावाटपावरून सुरु असलेला गुंता आता सुटला असून यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १५ जागा पदरात पाडून सरशी साधल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या वाट्याला २८ तर , राष्ट्रवादी अजित पवार गट ४ आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला १ असे जागावाटप झाले आहे. गेल्या २ दिवसात पालघरचा अपवाद वगळता अन्य मतदारसंघांचा प्रश्न सुटला आहे. त्यापैकी ठाणे मतदारसंघातून शिंदेंचे निष्ठावंत नरेश म्हस्के यांना तर नाशिकमधून विद्यमान खासदार यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. महाराष्ट्रात भाजपची ३० ते ३२ जागा लढवण्याची योजना होती. पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढे नाईलाज झाला आणि भाजपला ३ ते ४ जागांवर समझोता करावा लागला. यात अजित पवार गटाचा सध्या एकच खासदार आहे. पक्षाने ८ ते ९ जागांची मागणी केली होती .
जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…
सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…
जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…
लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…
आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…