महाराष्ट्र

आंबेघरमधील मृतांचा आकडा 15 पर्यंत वाढेल, मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

टीम लय भारी

सातारा:- साताऱ्यातील आंबेघरमध्ये दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. भूस्खलन झाल्याने येथील अनेक घरे दबली गेली आहेत. मागील काही तासापासून एनडीआरएफच्या टीमने बचाव कार्य सुरु केल्यानंतर आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. आंबेघरमधील मृतांचा आकडा 15 पर्यंत वाढेल, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे (Balasaheb Patil has informed that the death toll in Ambeghar will increase).

अतिवृष्टीमुळे येथील आजूबाजूच्या अनेक भागात पाणी साठल्याने आंबेघर घटनास्थळी पोहचण्यासाठी बराच वेळ लागत आहे. येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि नागरिकांना मदत करता यावी यासाठी या ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिली, तसेच तेथील लोकांचे सांत्वन करुन धीर दिला. शासन तुमच्या पाठिशी असून शासनातर्फे सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याचे यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले (Balasaheb Patil said that the government is behind you and will provide all possible help from the government).

डॉ. जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा, तळीये गाव वसविण्याचे काम ‘म्हाडा’ करणार

मंत्री यशोमती ठाकूर धावल्या अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी

आंबेघरमध्ये अतिवृष्टीमुळे भूस्खलन झाले असून यामध्ये 15 नागरिक दगावण्याची शक्यता आहे. आतापर्यत एनडीआरएफच्या मदतीने 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील 6 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून ढिगाऱ्यातून उर्वरीत मृतदेह काढण्याच्या सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या आहेत.

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आंबेघरला भेट देवून एनडीआरएफच्या टीमकडून सुरु असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली.

एनडीआरएफच्या टीमकडून बचाव कार्य सुरु आहे

मंत्री जयंत पाटलांचे पाय जमिनीवर, पूरग्रस्तांच्या समस्या घेतल्या जाणून

Maharashtra: 13 bodies recovered from two landslide sites in Satara

24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आंबेघर गावापासून सात किलोमीटर आधी पावसामुळे पूल वाहून गेल्याने घटनास्थळावर यंत्रणा पोहोचणे मुश्किल झाले होते. मात्र चौदा तासानंतर 24 जुलै रोजी अकरा वाजता एनडीआरएफची टीमन घटनास्थळावर पोहोचली

त्यानंतर युद्धपातळीवर येथील मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, यावेळी एनडीआरएफला काही ग्रामस्थ देखील घटनास्थळी मदत करत आहेत (Some villagers are also helping NDRF on the spot).

Sagar Gaikwad

Share
Published by
Sagar Gaikwad

Recent Posts

आता घरबसल्या काढा ओठांवरचे केस, जाणून घ्या सोपी पद्धत

काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…

11 hours ago

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

12 hours ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

14 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

14 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

15 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

15 hours ago