लय भारी न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजप मोठा पक्ष ठरल्यानंतर स्वतःहून सत्तास्थापनेचा दावा करणं ही या देशाच्या राजकारणाची परंपरा आहे. मात्र,भाजपने विलंब केला. राज्यपालांनी निमंत्रण दिल्यानंतर तरी सत्तास्थापन करुन बहुमत सिद्ध करावं. राज्यपालांनी दिलेल्या संधीचा भाजपने लाभ घ्यावा. असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.
खासदार राऊत यांनी रवित्वारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊत यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी शुभेच्छा दिल्या. राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याचं राऊत यांनी स्वागत केलं. भाजपने सत्तास्थापनेसाठी थांबण्याची गरज नव्हती. पुढच्या २४ तासात त्यांनी सत्तास्थापन करायला हवी. भाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला असल्याचा घणाघातही राऊत यांनी केला.
कुणाचेही आमदार फुटणार नाही. सत्तेच्या जोरावर खरेदी विक्री करता येत नाही असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, योग्य वेळी योग्य निर्णय घेणारा उद्धव ठाकरे यांच्याइतका चाणाक्ष नेता राज्यात नाही. असंही बोलण्यास राऊत विसरले नाही.
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(In today's politics lies, earlier politics…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Eknath shinde is bad CM). गेल्या…
काही सोप्या पद्धतींनी तुम्ही ओठांवरच्या नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवू शकता हे तुम्हाला माहीत आहे…
निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…
पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…