महाविकास आघाडी सरकारमधील काहीजण मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत. या काहीजणांना मराठा समाजाला आरक्षण मिळवू द्यायचे नाही, असेही ते म्हणाले.
तामिळनाडूसह ९ राज्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. तिथे आरक्षणाला स्थगिती मिळालेली नाही. पण महाविकास आघाडी सरकरामधीलच काही जणांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटत नाही. येत्या ८ ते २० मार्च या कालावधीत मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरकारने ही न्यायालयीन लढाई नीट लढली नाही व मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा थेट इशारा पाटील यांनी दिला ( Chandrakant Patil attacks on Thackeray government ).
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
जगात फक्त जैवविविधताच करू शकते विषमुक्त शेती, काय आहे सेंद्रिय शेती, काय आहे जैवाविविधता ???
Maratha reservation: SC to begin final hearing both physically and virtually from March 8
Maratha Quota: Constitution Bench of Supreme Court To Begin Final Hearing From 8th March
प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारवर तोफ डागली. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक नसावी असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. पण याच निर्णयात असाधारण स्थिती निर्माण झाल्यावर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
मराठा आरक्षणाचा विषय जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात गेला होता. तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा दाखला देत उच्च न्यायालयात युक्तिवाद करुन हा विषय नीट सप्रमाण समजावून सांगितला होता. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षणही मिळालं आणि मागासवर्ग आयोगाला मंजुरीही मिळाली. मात्र, हीच गोष्ट सर्वोच्च न्यायालयात कन्व्हिन्स करण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले ( Chandrakant Patil said, Mahavikas Aghadi government failed in court on Maratha reservation ).
तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे. पण त्या आरक्षणाला अद्यापही स्थगिती नाही. त्यासंदर्भातील खटला सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. मराठा आरक्षणाचा विषय आता ११ न्यायाधिशांसमोर सुनावणीसाठी येणार आहे. येत्या ८ ते २० मार्च दरम्यान या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची बाजू ताकदीने मांडली पाहिजे.
आरक्षण देण्याचा अधिकार हा त्या – त्या राज्यांचा आहे. त्यामध्ये केंद्र सरकारची काही भूमिका नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखविण्याचे प्रकार बंद करा. केंद्र सरकारने फक्त आर्थिकदृष्टया मागास घटकांना १० टक्के आरक्षण दिले आहे. पण त्यामध्येही न्यायालयात सुनावणी सुरु आहे. तसेच राज्यांना आता जातीचे आरक्षण देता येणार नाही असा केंद्राने कायदा केला आहे.
तसे आरक्षण दयायचे असेल तर त्या राज्यांच्या राज्यपालांनी आपला अहवाल राष्ट्रपतींकडे पाठविण्यात यावा असे कायद्यात आहे. परंतु महाराष्ट्र सरकारने हा निर्णय २०१४ मध्ये घेतला आहे, त्यामुळे आपल्याला हा कायदा लागू होत नाही असेही पाटील यांनी निर्दशनास आणून दिले.
तामिळनाडू सरकारने स्वत: आरक्षण दिलं. तामिळनाडू सरकार केंद्राकडे गेलं नव्हतं. इतर राज्याने आपल्या ताकदीवर जसं आरक्षण दिलं आणि टिकवलं. तसंच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या ताकदीवर आरक्षण टिकवलं पाहिजे. असेही त्यांनी ( Chandrakant Patil ) स्पष्ट केले.
गायकवाड कमिशनचा अहवाल २७०० पानांचा आहे. गायकवाड आयोगाच्या अहवालाचे अजूनही मराठीत भाषांतर करण्यात आलेले नाही. हा अहवाल कोणत्या मंत्र्याने वाचला आहे? एकाही मंत्र्याचा या अहवालावर अभ्यास नाही. मंत्र्यांनी हा अहवाल वाचला असेल तर त्यांनी माझ्यासमोर चर्चेला यावं, असे आव्हानही पाटील यांनी यावेळी दिले ( Chandrakant Patil challenged to Ministers ).
पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…
जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…
शहराच्या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्यावर संशयितांना…
मशरूममध्ये (mushrooms ) अनेक महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम,…
पुण्यात भर दिवसा बीजेएफ ज्वेलर्सच्या दुकानात (gold shop) सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना समोर आली…
मोदी सरकारच्या 10 वर्षांतील गरीब कल्याण योजनांच्या यशामुळे काँग्रेसकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने आरक्षण आणि संविधानाच्या…