कोरोना ( Coronavirus ) साथीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये असा गैरप्रकार वाढला आहे. अफवा व खोट्या बातम्या पेरुन भीती व द्वेष पसरविण्याच्या या प्रकारांवर महाराष्ट्र सायबर सेलने बारकाईने लक्ष ठेवून कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना देशमुख यांनी सायबर विभागाला दिल्या आहेत.
सोशल मीडियातून सामाजिक द्वेष पसरविणाऱ्या संदेशांचे पेव फुटले आहे. कोरोनाच्या काळात ( Coronavirus ) एकूण १८३ गुन्हे नोंद झाले आहेत. या गुन्ह्यांपैकी समाज माध्यमांतून द्वेष पसरविणारे ८७ गुन्हे आहेत. यामुळे ३७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ११४ जणांचा सदर गुन्ह्यांमध्ये हात असल्याची खात्रीदायक ओळख पटली आहे.
ताब्यात घेतलेल्यांपैकी ७ जणांविरुद्ध CrPC च्या कलम १०७ नुसार ( समाज-शांती भंग करण्याचा प्रयत्न ) गुन्हा नोंद केला आहे. सर्वाधिक प्रकरणे ( ८८ ) व्हॉट्सॲपच्या गैरवापराचे आहेत. त्या खालोखाल फेसबुक (४९) आहेत. टिक – टॉकच्या गैरवापराच्या ३ केसेस आहेत व ट्विटर संबंधित २ केसेस आहेत.
सायबर सेलने सर्व संबंधित समाज माध्यमांच्या प्लॅटफॉर्म्सना अशा पोस्ट्स काढून टाकायचे आदेश दिले आहेत. यातील ३२ पोस्ट्स काढून टाकण्यात यश आलं आहे. बाकी पोस्ट्स काढून टाकण्याची प्रक्रिया चालू आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्व जनतेस आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या चुकीच्या पोस्ट समाज माध्यमांवर आढळून आल्यास त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये करावी. पोलीस विभाग अशा समाजकंटकांविरुद्ध तातडीने कारवाई करील.
हे सुद्धा वाचा
नोटांमधून मुस्लीम कोरोना पसरवित असल्याचा खोटा प्रचार
पाकिस्तानातील व्हिडीओ भारतातील मुस्लीमांच्या नावावर खपवून सामाजिक विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…
3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…
लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…
मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…