लय भारी टीम
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन 4.0 सुरु आहे. रुग्णांची संख्या 1 लाख 67 हजाराच्या पुढे गेली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा २५ मे पासून विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे.
२५ मार्चपासून देशात लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हापासून देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर बंदी आहे. पण आता २५ मे २०२० पासून देशांतर्गत विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, २५ मे पासून विमानतळांना तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात त्यांनी ट्वीट करुन माहिती दिली आहे.
नागरी विमान वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही गेल्या आठवड्यापासून तयार आहोत. आम्ही पुर्णपणे तयार आहोत आणि कुठल्याहीक्षणी आम्ही नोटीस काढून दशांतर्गत विमानसेवा सुरू करू शकतो. अर्थात जर आम्हाला ग्रीन सिग्नल मिळाला तर विमानाचं बुकिंग सुरू करण्यास आणि तपासणीसाठी दोन ते तीन दिवस लागतील. असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितल आहे.
साऊथचा सुपरस्टार धनुषने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. धनुषच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘इडली…
आजकाल लोकांची जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. त्यामुळे लोकांना आरोग्याशी जुडलेले अनेक आजार होऊ लागले…
बहुतेक लोक शरीराच्या इतर अवयवांना निरोगी ठेवण्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम करतात, परंतु गुडघे निरोगी ठेवण्यास…
जयकुमार गोरे यांनी स्वतःहूनच स्वत:ला जलनायक(jaykumar gore is bad MLA), पाणीदार आमदार हा किताब लावून…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Begging dear sister postel 1500 rupees…
आपल्या खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जास्त तळलेले अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण…