महाराष्ट्र

साताऱ्यातील हरणाई कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद

टीम लय भारी

द्राक्षांच्या घडापासून ते ऊसाच्या पेरापर्यंत लावण,संगोपन आणि संरक्षण यांची इंत्यभूत माहिती देणारे प्रदर्शन सातारा येथे पार पडले. हरणाई सहकारी सूत गिरणी लि,येवळी यांनी आयोजित केलेल्या हरणाई कृषी २०२२ या प्रदर्शन सोहळ्याला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. हे प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस रणजितसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भरवण्यात आले होते. संपूर्ण शेती विकासासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी साताऱ्यात वडूज,माण खटाव भागातील हे पहिलेच कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे शुभारंभ साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

हरणाई कृषी २०२२ या प्रदर्शनाचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज येथील एसटी डेपो मैदान येथे १० मार्च ते १४ मार्च २०२२ या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजताच्या सुमारास आयोजन करण्यात आले होते. याप्रदर्शनला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून, अनेकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

प्रदर्शनात ‘या’ गोष्टींचे मार्गदर्शन…

या हरणाई कृषी २०२२ या प्रदर्शनास शेतीशी निगडीत विविध योजनांच्या माहितीपासून औषधे,खते,बि-बियाणांपर्यंत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय सिंचन प्रकल्पांपासून ट्रॅक्टर औजारापर्यंतचे मार्गदर्शन आणि विविध विषयांवर आधारित चर्चासत्र आणि मार्गदर्शनापासून मनोरंजनही या प्रदर्शनात करण्यात आले.

Pratiksha Pawar

Recent Posts

द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ

नाशिक शहरातील द्वारका चौफुली येथील वाहतूक कोंडी (avoid traffic) टाळण्यासाठी मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर द्वारका…

5 hours ago

नाशिकमध्ये मतदान केंद्र प्रमुखाला धमकी; नाशकात पती-पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघात काल (दि. 20) मतदानाची प्रक्रिया पार पडली. के के वाघ इंग्लिश स्कूल,…

6 hours ago

पुणे अपघात प्रकरण दडपणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा: अतुल लोंढे

पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे…

7 hours ago

भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोगाच्या उपाययोजना !

लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटचा टप्पा सोमवारी संपला. पण हा पाचवा टप्पा निवडणूक आयोगाने घोळ घातल्यामुळे…

9 hours ago

मिल्ट्री कॅम्पच्या माध्यमातून व्यक्तिमत्व विकास साधता येतो – डॉ संदीप भानोसे

आजच्या आधुनिक युगात जगण्याचा वेग 4G पेक्षाही वेगवान झाला आहे ! परिणामी दैनंदिन जीवनातले ताणतणाव,…

10 hours ago

मधमाशी शेतकऱ्याला भरभरून देते, पण शेतकरी तिला मारून टाकतो

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग कार्यमंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपिन जगताप यांनी लय भारीला मधमाश्यांविषयी…

11 hours ago