लय भारी न्यूज नेटवर्क
धुळे : अयोध्येमधील वादग्रस्त जागेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा काहीही निकाल आला तरी लोकांनी शांतता राखावी, असे सरकारने आवाहन केले आहे. तरीही एका नागरिकाने फेसबुकवर चिथावणीखोर मेसेज पोस्ट करण्याचा फाजिलपणा केला. या व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.
धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय शर्मा नावाच्या व्यक्तीने फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. ‘श्रीराम मंदिर भूमीस न्याय मिळताच मी दिपावली साजरी करणार. एक कलंक मिटेल इतिहासाचा’ असे त्यात नमूद केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही येवो. पण कुणीही वादग्रस्त मेसेज लिहू नये. आनंद साजरा करू नये. चितावणीखोर वक्तव्ये करू नयेत. फटाके वाजवू नयेत. गुलाल उधळू नये, अशा स्पष्ट सुचना पोलिसांनी जारी केलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह हिंदू व मुस्लीम धर्मातील संत – मौलवींनीही शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पण शर्मा याने आततायी मेसेज प्रसारित केला. त्यामुळे पोलिसांनी शर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घाटकोपर येथे घडलेली होर्डिंग दुर्घटने मागे असलेली पार्श्वभूमी व नाशिक शहरातील खाजगी होर्डिंगची (private hoarding)…
नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तीन मातब्बर उमेदवार आहेत. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार हेमंत…
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून संजय दिना पाटील, तर भाजपाकडून मिहीर कोटेचा हे दोन उमेदवार…
जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…
शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…
सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…