केंद्र सरकारने बैल सिंह इत्यादी प्राण्यांच्या शर्यतींवर बंदी घातली आहे. याच्या मागचा हेतू हिंस्त्र प्राण्यांचा वापर करून हिंसेला प्रोत्साहन न देणे इतका शुद्ध आहे. जानेवारी २०१६ मध्ये नवे नियम लागू करण्यात आले. आणि परत २०१७ साली या बाबतीतले काही नियम शिथिल करण्यात आले. बैलाच्या शर्यती अधिकृत झाल्या मात्र पेटाने या निर्णयाला स्थगिती दिली. बैल हा पाळीव प्राणी आहे त्याच्यामुळे कोणतीही हिंसा होत नाही असे मत यावेळी सदाभाऊ खोतांनी व्यक्त केले.
5 ट्रिलियन अर्थव्यवस्था हे फक्त एक स्वप्नच, सीतारामण यांच्यामुळे देशावर महागाईचे ओझे
गावकऱ्यांचा पारंपरिक खेळ असलेल्या बैलांच्या शर्यती बंदच होत्या. बैल शेतातून धावतो तेव्हा पिकाचं अतोनात नुकसान होत, परंतु शेतकऱ्याच्या मानण्याप्रमाणे बैल त्यादिवशी देवाच्या रूपात धावतो यामुळे शेतकऱ्याला आपल्या देवाचे कौतुकच वाटते. पूर्वापारपासून चालत आलेली शेतकऱ्यांची हि परंपरा मोडू नये म्हणून गोपीचंद पाडळकरांनी शर्यती व्हाव्यात अशी परवानगी दिली.
या शर्यतींसाठी वापरण्यात येणारे बैल हे खिल्लार जातीचे असतात. हि जात शर्यतींसाठीच प्रसिद्ध आहे. हि जात दूध देत नाही. या जातीचे बैल औताला जुंपत येत नाहीत. अत्यंत शक्तिशाली अशी हि जात उपयोग न झाल्यास संपुष्टात येईल आणि काही वर्षांनी या जातीचं अस्तित्व नामशेष होईल. अशी भीती वाटल्यामुळे पडळकरांनी शर्यतींना परवानगी दिली असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
रोहित पवारांकडून निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !
या काही गोष्टी सरकारला एका जागी बसून समजत नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांत वावरावं लागतं, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही पहिले आहेत परंतु ते सरकारपर्यंत पोहोचवणार कोण हा प्रश्न उरतोच. म्हणून आम्ही सरकारला शिकवतो आहोत. बंदी असतानासुद्धा शर्यतींना परवानगी दिल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचू शकेल अशा आशयाचे उद्गार सदाभाऊ खोत यांनी काढले.
आजकाल सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची झाली आहे. तसेच, नौकरी आणि इतर कामांमुळे लोकांना लवकरच तणाव…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…
कराड उत्तर मतदार संघात बाळासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत(Sharad Pawar's legacy will be run…
करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत (What exactly did…
ग्रीन टी बॅग वापरल्यानंतर आपण कचऱ्यात फेकतो असे सामान्यतः पाहिले जाते, परंतु आपण कधी विचार…
पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया कमजोर होते. त्यामुळे जड पदार्थ खाणे, उच्च प्रथिनयुक्त आहार, जास्त तेल…