टीम लय भारी
मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज महत्वाचा आदेश (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील सगळ्या सरकारी कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आळीपाळीने कामावर यावे तसेच ज्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना रजा हवी असल्यास ती तातडीने मंजूर करावी असे या जीआरमध्ये नमूद केले आहे.
या आदेशानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांना एक आड दिवस कामावर येण्याची सवलत राहील असे सूत्रांनी सांगितले. सामान्य प्रशासन विभागाने हा आदेश जारी केला आहे.
कामाच्या वेळांमध्ये सुद्धा लवचिकता ठेवण्यात येणार आहे. वाहतुकीमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी ही सुविधा दिली आहे.
हा आदेश ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे. आरोग्य, वैद्यकीय शिक्षण व आपत्कालिन सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मात्र सुटीचा लाभ मिळणार नाही असे आदेशात नमूद केले आहे.
मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana…
शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…
व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…
त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…
लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…