महाराष्ट्र

बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी घातले खंडेरायाला साकडे

राज्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट ‘५० खोके, एकदम ओके’ असा आरोप करायला लागले आहेत. त्याने सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस अधिकच मलीन होत चालली आहे. म्हणूनच की काय थेट जनतेत जावून त्यांच्या मनात सरकारविषयी आपुलकीची भावना निर्माण करण्यासाठी शिंदे सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम राज्यभरात सुरू केला आहे. सोमवारी जेजूरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुफान बॅटिंग केली. ‘सरकार जोरदारपणे काम करीत आहे. मात्र, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आमची सत्तेची गाडी सुसाट सुटली आहे. राज्यातल्या जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या जेजुरीतील कार्यक्रमात आम्ही खंडेरायाचा भंडारा उधळत राज्यातल्या बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे,’ असे साकडे घातले आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी खंडोबाचे दर्शनही घेतले.

यावेळी फडणवीस म्हणाले, विठोबा आणि खंडोबाला मागणी केली की पूर्ण होते. जेजुरीत सर्व सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी काम करणार असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. आता लोकांनी चकरा मारायच्या नाहीत. आता शासन थेट लोकांपर्यंत जात आहे. आपण एका-एका जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांपर्यंतची कामे केली आहेत. येत्या तीन वर्षात शेतकऱ्यांना सोलरवर वीज देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. महिलांना आपण एसटीमध्ये अर्ध्या पैशात तिकीट केले आहे. शिक्षक सेवक आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेच्या माध्यमातून पाच लाख घरे देणार आहोत. केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या माध्यमातून रोजगार मिळणार आहे. पुण्याच्या रिंगरोडचे काम सुरु आहे. सिंचनाच्या योजना सुरु आहेत. अजितदादा त्याबाबत बोलले आहेत. मी शब्द देतो, पुण्यातील सगळ्या पाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असेही फडणवीसांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा 
राहुल गांधी यांचे संसदेत आगमन; विरोधकांमध्ये संचारला उत्साह
भाजपाने थाळ्या वाजवून देशात दारिद्र्य आणले- नाना पटोले यांची सरकारवर टीका
भरबाजारात कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करायचे आहे. पुरुषांना पैसे दिले की ६० ते ७० टक्केच परत येतात. पण महिलांना पैसे दिले की १०० टक्के पैसे परत येतात. त्यामुळे महिलांसाठी विविध योजना आणल्या आहेत. महिलांना आता जास्त पैसे द्यायचे आहेत. मुलगी जन्माला आली की ते कुटुंब लखपती होणार आहे. मोदी आवास योजनेच्या माध्यमातून कुणीही बेघर राहणार नाही. सगळ्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवल्या जात आहेत. मोठ्या महापालिकामध्ये सांडपाणी प्रकिया करून पाणी वापरता येईल, का त्या बाबतीतही काम सुरु आहे. असेही फडणवीस यांनी सांगितले.

विवेक कांबळे

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

44 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago